शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

टंचाईनिवारणार्थ लाखोंचा खर्च; तरीही दुबळवेल गावात पाणीटंचाई

By admin | Published: April 04, 2017 3:13 PM

ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.

मालेगाव(वाशिम ): पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च होऊनही दुबळवेल येथे पाणीटंचाई कायम आहे. पाणीटंचाईची धग कमी होत नसेल, तर आमचे राजीनामे मंजूर करून कार्यमूक्त करा, अशी मागणी दूबळवेलच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने एकच धांदल उडाली. दुबळवेलचे ग्राम पंचायत सदस्य मोतीराम जयराम नानोटे, गजानन गणपत लबडे व सुशीला सुभाष देवढे यांनी म्हटले की, दुबळवेल ग्रामपंचायत ला कायमस्वरुपी सचिव नाही. दरवर्षी सचिवांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे नियमाप्रमाणे सभा व ग्रामसभा झाल्या नाहीत. या गावाची पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून नादूरूस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला. यावर्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम २०१८ मध्ये पूर्ण होईल. असे असताना प्रशासनाने सदर गाव पाणीपुरवठा योजनेत घेवुन पाणीपुरवठा करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने गावावर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामस्थांना दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.