शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

By admin | Published: April 03, 2017 2:09 AM

मार्चमध्ये अडीच ते तीन मीटरची नोंद; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संकल्पनेचे फलित

वाशिम, दि. २- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २0१४ आणि २0१५ या दोन वर्षांंंंंत ह्यरिचार्ज शाप्टह्ण संकल्पना वापरून ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे उभारले. यामुळे जमिनीच्या वर पाणी दिसत नसले, तरी जमिनीखालची पाणीपातळी ह्यस्टेबलह्ण राहणे शक्य झाल्याची माहिती येथील वरिष्ठ वैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी दिली.भौगोलिकदृष्ट्या वाशिम जिल्ह्याचा आकार छत्रीसारखा असून, उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडे उतार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाळ्यात कोसळणारे ८0 ते ९0 टक्के पाणी वाहून जाते. जिल्ह्यातील अधिकांश भूभाग ह्यबेसाल्टह्ण खडकाने व्यापलेला आहे. परिणामी, जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाणही केवळ ८ ते १0 टक्के आहे. तथापि, लहान नाल्यांवाटे पावसाचे वाहून जाणारे पाणी टप्प्याटप्प्याने साठवून त्याचे पुनर्भरण केले तरच जिल्ह्यात सिंचनाची प्रभावी सोय निर्माण होऊू शकेल. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्यगॅबियनह्ण बंधारे उभारण्याची अभिनव संकल्पना राबविली. यासाठी गाव परिसरातील उंच ठिकाणच्या लहान नाल्यांची निवड करुन त्यात गॅबियन बंधारा (जाळीचा बांध) टाकण्यात आला. उपलब्ध नाल्यांमध्ये २0 मीटर खोलीचा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन खाली २५ ते ३0 मीटर अंतरावर पुनर्भरण चर खोदण्यात आला. त्याची खोली अडीच ते तीन मीटर ठेवण्यात आली. त्यात पुन्हा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन भूमिगत बंधारा घेण्यात आला. यामुळे पुनर्भरण चरामध्ये साठलेले पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध लागला आहे. सोबतच जिल्ह्यातील ५0 पेक्षा अधिक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जलस्रोतांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळाली आहे.

गॅबियन पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे मार्च महिन्यातही जमिनीखालची पाणीपातळी अडीच ते तीन मीटर असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांच्या विद्यमान स्थितीमधील पाणीपातळीची तपासणी करूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. - बलवंत गजभियेवरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वाशिम