शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाशिम जिल्ह्यात यंदा ४.१५ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 16:09 IST

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देयंदा पीक उत्पादकता वाढविण्यावर कृषी विभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात १४ हजार ७४२ हेक्टर, तर तुरीच्या क्षेत्रात ७९८० हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.  गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा पीक उत्पादकता वाढविण्यावर कृषी विभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. त्याशिवाय शेतकºयांसाठी अनुदानित बियाणे व खतांचेही नियोजन करण्यात आले आहे.   कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात पीककर्ज वाटप, फळबाग लागवडीचे प्रलंबित अनुदान, उडिद, मुगाच्या उत्पादकतेत झालेली वाढ, बियाण्यांची उगवण क्षमता, खतांचे नियोजन, कृषीपंप जोडण्या आदि मुद्यांवर चर्चा करतानाच खरीप पीक पेरणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. वाशिम जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सरासरी ४ लाख ६९६ हेक्टर असताना, गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती. आता यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख १५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात नेहमीप्रमाणे सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख ९० हजार हेक्टर, तुरीचे क्षेत्र ६० हजार हेक्टर, कपाशीचे क्षेत्र २५ हजार हेक्टर, मुंगाचे क्षेत्र १५ हजार हेक्टर, उडिदाचे क्षेत्र २० हजार हेक्टर, ज्वारीचे क्षेत्र ४ हजार हेक्टर, तिळाचे ३०० हेक्टर आणि इतर खरीप पिकांचे क्षेत्र ७०० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग विशेष प्रयत्न करणार असून, या अंतर्गत शेतीशाळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून पीक उत्पादन पद्धती व पीक संरक्षण पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. सोयाबीनच्या पिकात ९५ टक्के क्षेत्रात आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १४ हजार ७४२ हेक्टर, तर तुरीच्या क्षेत्रात ७९८० हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.  कपाशीच्या क्षेत्रात घटकृषी विभागाने यंदा खरीप हंगामाचे नियोजन करताना कपाशी आणि ज्वारी या पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट कमी केले आहे. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९ हजार ७०१ हेक्टर असताना यंदा केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे, तर वन्यप्राण्यांमुळे ज्वारीच्या पेरणीवर मयार्दा येत असल्याने या पिकाचे क्षेत्र ११६४२ हेक्टर असताना केवळ ४ हजार हेक्टर उद्दिष्ट ठेवले आहे

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी