शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

लोणीफाटा परिसरात वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:36 AM

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ...

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ‘पीपीई कीट’ शासनाने उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी

शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच, शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकांची फवारणीही करण्यात आली.

रोजगारासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना त्यांच्या गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या मजुरांना तसेच स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मजुरांनी मागणी नोंदविण्याचे आवाहन प्रशसानाने केले.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवार व रविवारी करण्यात आली.

विळेगावातील हातपंप बंद

विळेगाव घुले : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्याची मागणी पंचायत समितीकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त

मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांनी केली.

रोहयोच्या कामाची देयके अदा करण्याची मागणी

तळप बु. : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शासनाने कुशल कामांचा निधी दिलेला नाही.

उन्हाची तीव्रता वाढली; जलस्रोत कोरडे

पोहरादेवी : यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही; मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जलस्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.