शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुरीचे दर प्रति क्विंटल ६ हजारांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 14:16 IST

जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तुरीसह इतर शेतमालाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले. शेतकऱ्यांकडे आता फारसा शेतमाल उरला नसला तरी, काही प्रमाणात त्यांना वाढत्या दरांचा फायदा होत आहे.जिल्ह्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक होऊनही पीक उत्पादन फारसे झाले नाही. दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले. काही शेतकºयांना खरीपातील तुरीचे बºयापैकी उत्पादन झाले, तर पाण्याअभावी रब्बी हंगामात हरभºयाच्या उत्पादनावर परिणाम झाला. शासनानेही या दोन्ही शेतमालास समाधानकारक असे हमीदर घोषीत केले नाही. तुरीला ५६७५, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभावा शासनाने जाहीर केले होते; परंतु बाजार समित्यांत मात्र या शेतमालाच हमीभावापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत होती. अगदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही बाजारात या शेतमालास अपेक्षीत असे दर मिळाले नाहीत. आता मात्र गेल्या १५ दिवसांपासून बाजारात तुरीच्या दरात कमालीची वाढ होत असून, सोमवारी या शेतमालास ६ रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. मंगरुळपीर आणि कारंजा बाजार समितीत सोमवारी अनुक्रमे ६३०० रुपये आणि ६२२५ रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी झाली. अर्थात तुरीला हमीभावापेक्षा ६५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले, तर हरभºयाची खरेदीही ४५०० रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी झाली. काही शेतकºयांना या वाढत्या दराचा फायदा होणार असला तरी, आता खरीपाच्या पृष्ठभुमीवर शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत असताना या शेतमालाच्या दरातील वाढ अनेक शेतकºयांना अडचणीत आणणारीच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम