शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

हळद पिकामुळे मजुरांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:41 AM

सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील ...

सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील काही वर्षांत बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सिंचन व्यवस्था केली, तर काही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून सिंचनविहिरी, शेततळ्याचा लाभ घेतला. तसेच शिरपूर

परिसरात रखडलेला मिर्झापूर सिंचन प्रकल्प ही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला. परिणामी काही वर्षांपासून शिरपूर परिसरात हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता तर वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सहाजिकच त्यातून शेतमजुरांना रोजगार निर्मिती झाली आहे. सध्या शिरपूर परिसरात हळद काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. हळद वेचणीची मजुरी प्रति कॅरेट वीस रुपयेप्रमाणे मिळत आहे. मजूर सकाळी पाचपासूनच हळद वेचणीसाठी शेतात जात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मजुरांना मजुरी मिळत आहे. सिंचन सुविधांमुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. हळद पिकामुळे शेतमजुरांना अधिक दिवस रोजगार प्राप्त होत आहे. मागील वर्षीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यापर्यंत शेतमजुरांना हळद पिकामुळे काम उपलब्ध झाले. यावर्षीही हळदीमुळे मजुरांना अधिक दिवस रोजगार मिळणार आहे.