शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड

By दिनेश पठाडे | Updated: November 25, 2023 14:18 IST

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला.

वाशिम :  भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी गाव आत्मनिर्भर असणे आवश्य आहे. ही बाब विचारात घेवून राज्य शासनाने नमो-११ सुत्री कार्यक्रमांतर्गत 'नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यातय आली असून ढोरखेडा आणि घायवळ ही दोन गावे नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव म्हणून विकसीत केली जाणार आहेत.

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. गाव निवडीबाबतचे निकषही जारी केले होते. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम अभियान किंवा इतर स्पर्धेत जिल्हास्तरावर बक्षिसप्राप्त गावांची निवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हास्तरीय समितीने मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा आणि कारंजा तालुक्यातील गायवळ या दोन गावांची निवड नुकतीच केली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे पाठविला आहे. ही गावे विकसीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अभिसरणाद्धारे निधीची उपलब्धता केली जाणार आहे.

कोणती कामे होणार?समिती मार्फत निवड करण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास आराखात तयार करुन त्याची कालबद्धरित्या अंमलबजावणी केली जाईल. सर्व समावेशक कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामख्याने गरजूंना पक्के घर बांधून देणे, रस्ते, रोजगार, कृषी व कृषी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधणे, सेंद्रीय शेतीसाठी साह्य व बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, उत्पादनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, सौर व हरित उर्जेचा वापर करणे, यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करणे आदी बाबीचा आराखड्यात समावेश करुन त्यानुसार येत्या काळात कामे केली जाणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिम