शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By संतोष वानखडे | Published: May 03, 2023 5:33 PM

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते.

वाशिम : उन्हाळ्यातही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीचा मुक्काम वाढला असून, मंगळवारी (दि.२) वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. एका दिवसात २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतरही सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने पीक नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६, ८, २५, ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, हळद, भाजीपाला व फळबागेचे नुकसान झाले. मे महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून, २ मे रोजी दिवसा वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगावात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर सुमारे एक ते दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात ५७.३० हेक्टरवरील पेरू, भाजीपाला,मुंग,कांदा, ज्वारी पिकाचे,रिसोड तालुक्यात ५८ हेक्टरमधील भाजीपाला व कांदा, मालेगाव तालुक्यात ११.८० हेक्टरमधील मुंग व कांदा, कारंजा तालुक्यात १४०.२० हेक्टरमधील भाजीपाला,मुंग, कांदा,भूईमुग, गहु, ज्वारी,निंबू,केळी,संत्रा,तीळ या शेतपीकाचे नुकसान झाल्याची व मौजे शेवती येथील दोन विहिरी खचल्याची प्राथमिक माहिती आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून, शासनाने वाढीव निकषानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केली.

टॅग्स :washimवाशिम