शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला! 

By दिनेश पठाडे | Published: December 05, 2023 3:08 PM

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला.

वाशिम: मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले, तर त्यानंतर पडलेल्या धुक्याने हरभऱ्याचे पीक जळून गेले. या प्रकारामुळे हाती काहीच येणार नसल्याने दोन शेतकरी बांधवांनी शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर नांगर फिरवून शेतच मोकळे केले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला.

खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर सोयाबीन हे पीक निघाल्यानंतर तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकरी बंधूनी २६२ व २६४ या गट क्रमांकातील स्वत:च्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हे पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच किन्हीराजा परिसरात मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिटी झाली. यानंतर धुकेही पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकऱ्यांच्या शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभऱ्याचे पीक पूर्णपणे पीक करपले. त्यामुळे यातून कोणतेच उत्पन्न मिळण्याची आशा उरली नाही. त्यामुळे निराश झालेल्या नालिंदे शेतकरी भावंडांनी या १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर ५ डिसेंबर रोजी नांगर फिरवून शेतच मोकळे केले. या नुकसानापोटी प्रशासनाने शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी