शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

ग्राम सुरक्षा दलाने उचलली गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:55 PM

कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे.

वाकद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत बाळखेड येथे ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली असून, या दलाने गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलली आहे.ग्रामसुरक्षा दलाची स्थापना झाल्यानंतर बुधवारी बाळखेड येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच मालता दिनकर इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रत्नपारखी, पोलीस पाटील प्रकाश पाटील पऱ्हाड, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष केशव ढोले होते. गावात सामाजिक एकोपा कायम राहावा, भांडण, तंटे निर्माण होऊ नयेत, अपवादात्मक परिस्थितीत वाद निर्माण झाला तर आपापसातील भांडण, तंटे सामोपचारातून निकाली काढणे, गावातून गैरप्रकारांना हद्दपार करणे, आदी कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे. या दलात एकूण ५० युवकांचा समावेश आहे. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. संचालन ग्राम पंचायत सदस्य धनंजय अवताडे यांनी केले.