शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 2:40 PM

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. या निर्णयामुळे शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील सुमारे २ लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या ९० हजार शेतकºयांसह कर्ज पुनर्गठण झालेले तथा जुन्या कर्जमाफी योजनेतील लाभ न मिळालेल्या सुमारे १ लाख ६० हजार शेतकºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे. त्यानुसार, कर्जमाफीचा हा आकडा सुमारे ५०० कोटीपर्यंत जाईल, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.आॅक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यासह गत काही महिन्यांमध्ये सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे. या पृष्ठभुमिवर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरूवात ही मार्च २०२० या महिन्यापासून होणार आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच कर्जाचे हप्ते नियमित भरणाºया शेतकºयांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.दरम्यान, आज जाहीर झालेल्या निर्णयास अनुसरून शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील २०१४-१५ पासून थकबाकीदार असलेल्या ९० हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्यासोबतच कर्ज पुनर्गठण आणि यापूर्वी शासनस्तरावरून जाहीर झालेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेले; परंतु अद्यापपर्यंत कर्ज माफ न झालेल्या शेतकºयांनाही लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

विधानसभेत शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाच्या निकषानुसार ८० ते ९० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासह कर्ज पुनर्गठण आणि जुन्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकºयांनाही पीक कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सह. संस्था

 

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज