शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रीय संपादणूक परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 20:25 IST

वाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे, अशी माहिती वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देनिकाल जाहीरराज्यातही पहिल्या १० जिल्ह्यात 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे, अशी माहिती वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी रविवारी दिली.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.  वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात आली. शाळेतील शिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी किती ’लर्निंग आऊट कम’ (अध्ययन निष्पत्ती) प्राप्त केले आहे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील काही निवडक शाळांतील विद्यार्थांची पडताळणी या चाचणीच्या आधारे करण्यात आली. देशभरातील सर्व निवडक शाळांमध्ये १३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. हे एकप्रकारे सर्वेक्षण असून, तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बहुपयार्यी प्रश्नपद्धतीने ही चाचणी घेण्यात आली. तिसरी व पाचवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न होते तर आठवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित ६० गुणांसाठी ६० प्रश्न होते.  परीक्षा संपल्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन त्याच दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा कक्षात जमा करण्यात आल्या. या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका राज्यस्तरावर पाठवून तपासण्यात आल्या. त्याचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्याने अमरावती विभागात प्रथम, तर राज्यात पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले. जाहीर निकालानुसार तिसºया वर्गाच्या चाचणीत वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयात ७१.८४ टक्क्यांसह राज्यात नववे, भाषा विषयात ७२.४४ टक्क्यांसह १३ वे, तर गणित विषयात ६८.२ टक्क्यांसह तिसरे स्थान पटकावले. वर्ग ५ वीच्या चाचणीत पर्यावरण शास्त्र विषयात ५९.७४ टक्क्यांसह नववे, भाषा विषयात ६२.८६ टक्क्यांसह १४ वे, तर गणित विषयात ५६.६१ टक्क्यांसह आठवे स्थान पटकावले. वर्ग ८ वीच्या चाचणीत विज्ञान विषयात ३८.१ टक्क्यांसह २१ वे, भाषा विषयात ५९.५४ टक्क्यांसह २२ वे, गणित विषयात ४१.५७ टक्क्यांसह १२ वे, तर सामाजिक शास्त्र विषयात ४१.८९ टक्क्यांसह १५ वे स्थान पटकावले. वाशिम जिल्ह्याची एकूण कामगिरी अमरावती विभागात पहिल्या, तर राज्यात नवव्या क्रमांकाची ठरली आहे. 

बुलडाणा विभागात दुसरासंपादणूक सर्वेक्षणात अमरावती विभागापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात विभागात तिसºया स्थानावर अकोला, चौथ्या स्थानावर अमरावती, तर पाचव्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील आठव्या वर्गाच्या विद्यांर्थ्यांची शैक्षणिक प्रगती अमरावती विभागात सर्वात सरस ठरली आहे. संपादणूक सर्वेक्षण अहवाला नुसार बुलडाण्यातील आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात ४५.३५ टक्क्यांसह ६ वे, भाषा विषयात ६३.७६ टक्क्यांसह १४  वे, गणित विषयात ४४.२ टक्क्यांसह ७ वे, तर सामाजिक शास्त्र विषयात ४६.४४ टक्क्यांसह ६ वे स्थान पटकावले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षकांच्या सहकायार्ने शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय संपादणूक सवैक्षणात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. राज्यातही टॉप टेन मध्ये आहे. सर्वांच्या सहकायार्तून हे शक्य झाले असून, यापुढेही शैक्षणिक उर्जा उंचाविण्यासाठी प्रत्यक्ष कृती व विविध उपक्रमावर भर दिला जाईल.-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाeducationशैक्षणिक