शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By admin | Published: July 16, 2017 8:24 PM

वाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली होती. यामुळे काही ठिकाणी दुबार; तर कुठे तिबार पेरणीही करावी लागली. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. १५ जुलै रोजी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.१६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३.४० मीमी पाऊस झाला. वाशिम तालुक्यात ३०.४० मीमी, मालेगाव तालुक्यात १७ मीमी, रिसोड तालुक्यात ४५ मीमी, मंगरूळपीर तालुक्यात १३ मीमी, मानोरा तालुक्यात २२ मीमी तर कारंजा तालुक्यात १३ मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे.