शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

कलम १८८ काय आहे रे भाऊ? पाच हजारांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:26 AM

साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता आजमितीस नागरिकांना उगमत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता आजमितीस नागरिकांना उगमत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपला असून, तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. दुसरी लाट ओसल्यानंतर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीवर नवे निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लावले आहेत. कोरोनाचा प्रसार गर्दीद्वारे होतो आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. यात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार १५९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर शहरात अनिवार्य करण्यात आल्यापासून ५९,१११ वाहनधारकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करून १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.

--------------

बॉक्स: काय आहे कलम १८८

१)१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी प्रतिबंधात्मक वेगवेगळे आदेश काढतात.

२)या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

३) विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की तो व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरतो.

-------------------

१) जिल्ह्यातील दाखल गुन्हे - ५१५९

२) वाहने जप्त -२२११

३) दंडवसुली - १,६९,१४, ७००

-----------

बॉक्स : काय होऊ शकते शिक्षा

१) साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

२) दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारवास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

३) हा जामीनपात्र गुन्हा असून, मोठ्या संख्येने पोलिस कारवाईचे आकडे समोर येत आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी कोर्टासमोर येतील. त्यातील काहींना दंड, शिक्षा मिळेल तर काही निर्दोष सुटतील.

--------------

कोट: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कलम १८८ नुसार कारवाई केली जाते. मुळात दंड किवा शिक्षा करणे, हाच या कायद्याचा उद्देश नाही, तर जनतेला परिस्थितीचे गांभीर्य कळावे, त्यांनी नियमांचे पालन करावे म्हणून कारवाई करावी लागते. तथापि, जनता कायद्याचे पालन करण्याबाबत फारशी गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-वसंत परदेसी ,

जिल्हा पोलीस अधीक्षक