शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करा ! -  शण्मुगराजन एस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:22 IST

Washim News कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी केले.

वाशिम : गावाचा विकास साधायचा असेल तर गावकरी व प्रशासन यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे गावाच्या समृद्धीसाठी कोण-कोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, याचे काळजीपूर्वक नियोजन करून सदर कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी केले. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने बोरव्हा बु. येथे आयोजित विविध यंत्रणांच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, पानी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता, गावाच्या विकासासाठी काम करण्याची एक संधी म्हणून पाहावे. या स्पर्धेत किती क्रमांकाचे बक्षीस मिळते, यापेक्षा आपले गाव आणि गावातील नागरिकांचा विकास कसा करता येईल, हे ध्येय समोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून गावामध्ये नक्कीच समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, आतापर्यंत आपण मृद आणि जलसंधारणाच्या कामांमधून पाणी साठविण्यासाठी अनेक कामे केली आहेत. पण आता या पाण्याचा योग्य वापर करून आपले उत्पन्न अशाप्रकारे वाढेल, याचे नियोजन प्रत्येकाने करावे. तसेच रोप लागवड, पूरक व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावे, असे आवाहन केले.हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत रोजगार हमी योजनेतून करावयाची अभिसरणाच्या कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. त्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे, अशा सूचना केल्या. यावेळी तोटावर, डॉ. पोळ यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिम