शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

यवतमाळ-अमरावतीकरांनी वाढविली जिल्ह्याची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:41 AM

अमरावती, अकोला आणि यवतमाळ हे तीन जिल्हे वाशिम जिल्ह्यास लागून आहेत. वाशिमच्या तुलनेत या तीनही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण ...

अमरावती, अकोला आणि यवतमाळ हे तीन जिल्हे वाशिम जिल्ह्यास लागून आहेत. वाशिमच्या तुलनेत या तीनही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. अकोला जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत २७ हजार २०० लोकांना, यवतमाळ जिल्ह्यात २७ हजार ५५१ लोकांना, तर अमरावती जिल्ह्यात ४९ हजार २७ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर वाशिम जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत १५ हजार ६२५ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. अर्थात वाशिमच्या तुलनेत यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जवळपास दुप्पटच आहे, तर अमरावती जिल्ह्यात तिप्पट आहे. या तीनही जिल्ह्यातून दरदिवशी हजारो नागरिक वाशिम-जिल्ह्यात ये-जा करतात. त्यात कोरोना वाहकांचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

---------------

एसटीमधून सर्वाधिक नागरिकांचा प्रवास

अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या तिन्ही जिल्ह्यांत वाशिम येथून दरदिवशी ५० पेक्षा अधिक एसटीची ये-जा सुरू असते. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील किमान १५०० प्रवासी वाशिम येथे प्रवास करतात. या प्रवाशांत कोरोना वाहक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-------------------------

१५ ट्रॅव्हल्सची रात्री वाहतूक

जिल्ह्यात दिवसा धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या कमी असली तरी रात्री औरंगाबाद, नांदेड, पुणे येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस अकोला, अमरावती, यवतमाळ येथे जातात, तर अमरावती, अकोला आणि यवतमाळ येथून वाशिम येथे १५ खासगी बस वाशिम जिल्ह्यात दाखल होतात. या बसमधून साधारण ४०० प्रवासी वाशिम जिल्ह्यात दरदिवशी दाखल होतात.

------------

रेल्वेने अकोल्यात प्रवाशांची ये-जा

जिल्ह्यात वाशिम येथे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणाहून हिंगोली, नांदेड, अकोला येथेच वाशिमकरांना प्रवास करता येतो. त्यात अकोला येथे रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून, हिंगोली, नांदेडच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. साधारण वाशिम-अकोला येथील २०० प्रवाशांची या ठिकाणाहून दरदिवशी ये-जा सुरू असते.

-----------

बाहेरगावहून येणाऱ्यांची चाचणीच नाही

वाशिम जिल्ह्यात अमरावती, अकोला, यवतमाळसह बुलडाणा जिल्ह्यातूनही दरदिवशी हजारो प्रवासी दाखल होतात; परंतु जिल्ह्यातील कोणत्याच बसस्थानकावर या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा नसून, रेल्वेस्थानकावरही कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे प्रवास करून आलेले नागरिक थेट शहरात प्रवेश करतात. शिवाय जिल्ह्याच्या कोणत्याच सीमेवरही आता कोरोना चाचणी करण्याची तसदी घेतली जात नाही.

---------

एकूण कोरोनाबाधित : १५६२५

बरे झालेले : १२७१६

उपचार सुरू असलेले : २७२३

गृह विलगीकरणातील व्यक्ती -१५००

कोरोना बळी : १८५

------------