शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:10 IST

विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देवन खात्याचा कारभार झुंज, आजार, वृद्धापकाळाची कारणे

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तीन आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर वन खात्याने दिलेल्या उत्तराने ही माहिती उघड झाली आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यात विदर्भात एकूण १५ वाघ मृत्युमुखी पडले. शिकारीच्या उद्देशाने यातील काहींचा बळी गेल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात वन खात्याने ही बाब नाकारली आहे. १५ पैकी दहा वाघांचे मृत्यू हे आपसी झुंज, आजारपण, वृद्धापकाळ अशा विविध नैसर्गिक कारणांनी झाल्याचे सांगितले जाते. दोन वाघांचा मृत्यू शेतातील कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे झाला. तर तीन वाघांचा मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे म्हटले आहे. वाघाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन शेतकऱ्यांवर वन गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, वन खात्यातील कुणावरही वाघाचे एवढे मृत्यू होवूनही कारवाई केली गेली नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची हाडे, नखे, दात जप्त केले गेले. त्यात वन गुन्हाही नोंदविला गेला. पुढे तपासात अशा पद्धतीने तीन वाघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने विविध १७ जणांना अटक केली गेली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु संबंधित विभागातील वन अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही वाघांच्या या मृत्यूचा त्रास झाल्याचे ऐकिवात नाही.

टॅग्स :Tigerवाघ