शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:31 PM

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ...

ठळक मुद्दे५० जणांना अपंगत्व : वेगाशी स्पर्धा आणि वाहतुकीचे नियम पायदळी

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, तर दुचाकीच्या अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. टिप्परखाली चिरडून नायगाव येथे झालेला चिमुकलीचा मृत्यू मन हेलावून सोडणारा होता.वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले की, अपघात निश्चितच होतो. जिल्हाभरात मार्च महिन्यात झालेल्या अपघातातही हीच कारणे आहेत. मार्च महिन्याची सुरुवात जवळा येथे एका ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन झाली. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. यवतमाळ शहरात ६ मार्चच्या रात्री दोन भरधाव कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. मात्र अपघाताची तीव्रता भीषण होती. पांढरकवडा तालुक्यातील इचोड गावाजवळ ९ मार्च रोजी एक वृद्ध अपघातात ठार झाला. तर उमरखेड तालुक्यात मार्लेगावजवळ दोन ट्रकच्या धडकेत छातीत लोखंडी रॉड शिरल्याने चालक दगावला. १४ मार्च रोजी वणी तालुक्यातील खांदलाजवळ दुचाकीस्वार दोघे जण अपघाताचे बळी ठरले. वणी तालुक्यातील करणवाडी येथे १५ मार्चला ट्रॅक्टर चालक ठार झाला तर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या अपघातात यवतमाळचे पं. शशीकांत शर्मा ठार झाले.यवतमाळच्या बसस्थानक चौकातील सिग्नलवर १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताने संपूर्ण यवतमाळ हादरुन गेले होते. दुचाकीवरील सासरे आणि सुनेला ट्रकने अक्षरश: चिरडले. या अपघातात दोन वर्षाची चिमुकली माही बचावली. या अपघातानंतर यवतमाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी या अपघातातून धडा घेत ‘यु-टर्न’चा प्रयोग सुरू केला. नेर तालुक्यातील बाळेगावजवळ अ‍ॅपे आॅटोरिक्षा उलटून सात जण गंभीर जखमी झाले. २३ मार्च रोजी यवतमाळातील मेळावा आटोपून उमरखेडकडे जाताना माजी आमदार विजय खडसे जखमी झाले. त्यांच्या वाहनावर ट्रीपल सीट दुचाकी आदळली. ते तिघे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. २४ मार्चला शिरपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण दुचाकी अपघातात गतप्राण झाला.२८ मार्चच्या पहाटे परभणी येथून चंद्रपूरच्या महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला ट्रकने धडक दिली. त्यात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच २९ मार्च रोजी कोसारा गावाजवळ भीषण अपघात झाला. टिप्परने दिलेल्या धडकेत मिनीडोअरमधील दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले होते तर दुसºया तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. याच दिवशी आॅटोरिक्षातून उतरुन रस्ता पार करताना एक चिमुरडी टिप्पर खाली आली. नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले.जिल्ह्यातील या अपघाताच्या मालिकेने कुणाचे वडील, कुणाची आई तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. वाहन चालविताना झालेली थोडी चूक जीवावर बेतली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात टाळता येतात.दोन प्राध्यापकांना गमवावा लागला जीवमार्च महिन्यात दुचाकी अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. १४ मार्च रोजी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण येथे दुचाकी स्लीप होऊन प्रा.डॉ.दिनेश भालेराव ठार झाले. तर वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. अनिल नन्नावरे वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला येथे अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांना एसटी बसने धडक दिली. शिक्षण क्षेत्रात या दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात