शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

१८ गावे पाणी टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:35 PM

शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील १८ गावांत विविध कामे घेण्यात आली. यातून ही गावे आता पाणीटंचाईमुक्त झाली आहे. तालुक्यात जलयुक्त शिवारअंतर्गत ३२३ कामे पूर्णत्वास गेली आहे.

ठळक मुद्देराळेगाव तालुका : जलयुक्त शिवारातून ३२३ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील १८ गावांत विविध कामे घेण्यात आली. यातून ही गावे आता पाणीटंचाईमुक्त झाली आहे.तालुक्यात जलयुक्त शिवारअंतर्गत ३२३ कामे पूर्णत्वास गेली आहे. ४० कामे प्रगतीपथावर आहे. यावर्षी तालुक्यात केवळ ५८७ मीमी पाऊस झाला. मात्र कमी पाऊस पडला असतानाही पडलेला पाऊस या योजनेअंतर्गत जमिनीत मुरविण्यात आल्याने ही गावे जलसमृद्ध झाली. आता ती पाणीटंचाईपासून मुक्त झाली आहे. निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोग होणार आहे. शिवाय भूजल पातळीसुद्धा वाढली आहे.सुरूवातीला तालुक्यात ४८५ कामे प्रस्तावित होती. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीनंतर त्यातील ४४३ कामांना प्रत्यक्ष हिरवी झेंडी मिळाली. भिमसेनपूर, एकलारा, धुमक-चाचोरा, आंजी, पिंपरी दुर्ग, वेडशी, वाठोडा, गुजरी, झरगड, खडकी, मंगी, कोपरी, श्रीरामपूर, पिंपळापूर, पळसकुंड, खेमकुंड, खैरगाव (जवादे), खडकीसुकळी या गावांत जलयुक्तची कामे घेण्यात आली. त्याअंतर्गत पाच सलग समतल चर, १२ ढाळीचे बांध, ८९ शेततळे, पाच सिमेंट बंधारा दुरूस्ती, नाला बांध, नाला खोलीकरण, १३६ रिचार्ज शाफ्ट, वनतळे, २१ पाणी साठवण तलाव, ३७ विहीर पुनर्भरण आदी कामे करण्यात आली.या कामांमुळे ५०० ते ६०० हेक्टर कृषी भूमी सिंचित होऊ शकणार आहे. केवळ २५ लाख रुपयांत ही कामे पूर्ण करण्यात आली. याशिवाय ३०० शेततळे, मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान मोहिमेचे अध्यक्ष संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कामे पूर्णत्वास नेली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई