शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

कामगार कल्याणची २२ केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:44 PM

कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद नसल्याचे कारणखासगी क्षेत्रातील कामगारांना धक्का

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे. शिवाय माहितीअभावी योजनांपासून वंचित राहण्याचीही भीती व्यक्त होत आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेतील (दुकान/संस्था) कामगारांची नोंदणी कामगार कल्याण केंद्रात केली जाते. कामगाराचे १२ रुपये, आस्थापनेचे ३६ आणि शासनाचे २४ रुपये, असा यासाठी आर्थिक वाटा असतो. नोंदणी झालेल्या आणि रक्कम कपात होत असलेल्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना विविध लाभ दिले जातात. विशेष म्हणजे आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.राज्यात कार्यरत असलेल्या २३० केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक कामगारांची नोंद करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या कामगारांना योजनांचा लाभही दिला जात आहे. मात्र प्रतिसाद नसल्याचे सांगत राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील ही केंदे्र आहेत. प्रतिसाद अर्थात सभासद नोंदणी मानली जाते. बंद होत असलेल्या केंद्रांची नोंदणी केवळ ८०० ते १२०० च्या घरात आहे. नोंदणी वाढविण्याची जबाबदारी केंद्र संचालकाची आहे. यात ते कमी पडल्याचे स्पष्ट होते.यात नुकसान मात्र नोंदणी झालेल्या कामगारांचे होणार आहे. सभासद नोंदणीचे उद्दिष्ट तर दूर त्या जवळपासही पोहोचले नसलेली ही २२ केंदे्र असल्याचे सांगितले जाते. केंद्र कार्यालयाचा पाच वर्षांचा आढावा घेऊन सदर केंद्रांना कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ एप्रिलपासून ही केंदे्र बंद होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या ठिकाणची केंदे्र बंद केली जात आहेत.रिक्त पदांमुळे कार्य प्रभावितचांगला प्रतिसाद असलेल्या केंद्रांचे कार्य रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहेत. केंद्र कार्यालयाच्या ठिकाणी केंद्र संचालक, केंद्र प्रमुखांची वानवा आहे. बंद होणाऱ्या केंद्रातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर पाठविले जाणार आहे.असे मिळतात कामगारांना लाभकामगार केंद्रात नोंदणी झाली असलेले कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ मोठा दिलासा देणारे आहेत. शिष्यवृत्ती, एमएससीआयटी याकरिता आर्थिक लाभ दिले जातात. पुरस्काराने सन्मानित केले जाते. राज्यस्तर कबड्डी व कुस्ती स्पर्धेत सहभागाची संधी मिळते. विशेष म्हणजे असाध्य रोगासाठी हातभार लावला जातो.

टॅग्स :Governmentसरकार