शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

सहा नगरपंचायतींना २४ कोटींचा निधी

By admin | Published: January 03, 2016 3:03 AM

जिल्ह्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या सहा नगरपंचायतींना शासनाकडून पहिल्याच वर्षी चार कोटी रुपयांचा विकास निधी दोन टप्यात दिला जाणार आहे.

नागरी विकास : नगरउत्थानचा हातभार यवतमाळ : जिल्ह्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या सहा नगरपंचायतींना शासनाकडून पहिल्याच वर्षी चार कोटी रुपयांचा विकास निधी दोन टप्यात दिला जाणार आहे. जिल्ह्यातील झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या नगरपंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. झरी, राळेगाव, बाभूळगावात भाजपाची तर कळंब व मारेगावात शिवसेनेची सत्ता आली. महागावात परिवर्तनने सत्ता स्थापन केली. नगरपंचायती स्थापन झाल्या मात्र विकासाचे काय हा प्रश्न कायम आहे. या नगरपंचायतींकडे स्वत:चे उत्पन्न अल्पशे आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर खर्च करण्यासाठी निधी कोठून आणावा हा प्रश्न सदस्यांना पडला होता. ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने नागरिकांच्याही विकासाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. म्हणूनच या नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये सत्ता कुणाचीही असो त्यांना चार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातील दोन कोटी रुपये नगरउत्थान कार्यक्रमातून तर उर्वरित दोन कोटी विशेष निधी म्हणून राहणार आहे. निर्विवाद सत्ता असलेल्या राळेगाव नगरपंचायतीसाठी निधी बाबत सॉप्ट कॉर्नर ठेवावा अशी भाजपाची मागणी आहे. प्रोत्साहन म्हणून पाच कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी करण्यात आली होती. कळंब व बाभूळगावलासुध्दा अतिरिक्त निधी मिळावा म्हणून नेत्यांनी प्रयत्न करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची मागणी आहे. एकहाती सत्ता असती तर कळंब व बाभूळगावलाही अतिरिक्त निधी मिळाला असता. मात्र युतीतील योग्य समन्वयाअभावी आधी सत्ता व आता या निधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)