शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

दुष्काळग्रस्तांसाठी हवे २४५ कोटी

By admin | Published: January 09, 2016 2:54 AM

पावसाअभावी खरीप हंगाम बुडाल्याने दुष्काळात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

यवतमाळ : पावसाअभावी खरीप हंगाम बुडाल्याने दुष्काळात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या या रकमेची प्रतीक्षा आहे. सरासरी पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत आल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला. पीक बुडालेल्या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. सुमारे साडेचार हजार रुपये प्रति हेक्टर मदत गतवर्षी दिली गेली होती. यंदाही हाच निकष कायम राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी २४५ कोटी रुपये मदत वाटपासाठी प्राप्त झाले होते. यंदाही तेवढीच रक्कम लागणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार ५३ गावांमधील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे. नजर आणेवारीच्या पहिल्या टप्प्यानुसार नऊ लाख रुपयांची मागणी केली गेली होती. मात्र त्यातही केवळ पाच लाख मंजूर करण्यात आले. आता मदतीचे आणखी दोन टप्पे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नेमकी किती रक्कम मदत वाटपासाठी हवी याची मागणी नोंदविली जात नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहकारी बँकेपुढे पुढील कर्जासाठी आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सक्तीची कर्ज वसुली बंद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)