शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मेहनत रंग लाई; झेडपी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत मिळवले यश अन् घेतली आकाशभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 3:07 PM

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा महादीप उपक्रमस्पर्धा परीक्षेतील टाॅप ३७ विद्यार्थ्यांची विमानवारी

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळातील टॅलेंट शोधून काढण्यासाठी महादीप उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांतून टाॅप ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूर हवाई सफर घडविण्यात आली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. 

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अंतिम फेरीत टाॅप ठरलेल्या या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सायकल देऊन गौरविले. विमान प्रवासासाठी ४२ जणांची निवड झाली होती. त्यातील ३७ जण गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूरला रवाना झाले. टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ विद्यार्थी हे घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गावातील असून इतर नऊ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विमानवारीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे कष्टकरी कुटुंबातील असून त्यांनी विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत मोठ्या कष्टाने हे यशस्वी उड्डाण घेतलेले आहे.

तिवसाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तर स्पर्धा परीक्षेचा दीड तासाचा पेपर अवघ्या १५-२० मिनिटांत सोडवून शिक्षकांनी अवाक् केले होते. याच शाळेतील ११ विद्यार्थी टाॅप ठरले आहे. टाॅप ठरलेल्या या ११ जणांमध्ये सहा मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. याशिवाय उर्दू माध्यमाचे चार विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे चार आणि एका दिव्यांग विद्यार्थ्यानेही टाॅप विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक गणवेशाचेही वाटप केले.

विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांंना जिल्हा परिषदेने महादीपच्या माध्यमातून ही हवाई सफर घडविली. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांसह पालकांचा जिल्हा परिषदेच्या सभागृहात सायकल देवून गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांंनी घेतलेले कष्ट यामुळेच हा गौरव मिळाल्याचे सांगत या पुढील काळातही अभ्यासू वृत्ती कायम ठेऊ, असा शब्द त्यांनी दिला.

शिक्षकांचेही कौतुक

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी गुरुजनांचेही कौतुक केले. त्यांनी चांगली मेहनत घेत विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद दरवर्षी राबविणार उपक्रम

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने महादीप उपक्रम राबविण्यात आला. एवढ्यावरच ही स्पर्धा थांबणार नाही, यापुढेही ती सुरू राहील, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत दीड तासांची स्पर्धा परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. येणाऱ्या काळात अधिकारी विद्यार्थ्यांना यात सहभागासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पांंचाळ यांनी सांगितले.

इच्छाशक्ती महत्त्वाची

जिल्हा परिषदेच्या सभागृहात कौतुक सोहळ्यात ५० पैकी ४९ गुण मिळवित पहिला आलेल्या श्रावण अडकिने आणि मुलीतून पहिली आलेल्या पलक शेलूकार यांनी भावना व्यक्त केल्या. इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, याची प्रचिती आल्याचे पलक या वेळी म्हणाली.

टॅग्स :Educationशिक्षणzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीyavatmal-acयवतमाळ