शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

४२ वर्षांत कापूस आठ अन् पगारात २०० पट वाढ

By admin | Published: November 18, 2015 2:34 AM

शेतीमाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गत ४२ वर्षांचा आलेख बघितला तर जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो.

जमीन-आसमानचा फरक : कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी, कास्तकारांचे वर्षभर हालचज्ञानेश्वर मुंदे यवतमाळशेतीमाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गत ४२ वर्षांचा आलेख बघितला तर जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो. ५०० रुपये क्ंिवटलच्या कापसाने चार हजारपर्यंत मजल मारली. तर प्राध्यापकांचा पगार ६०० रुपयांवरून सव्वालाखांवर जाऊन पोहोचला आहे. ४२ वर्षात कापसाच्या दरात आठपट आणि प्राध्यापकांच्या वेतनात तब्बल २०८ पट वाढ झाली. शेतात रात्रंदिवस मेहनत करूनही काहीच हाती लागत नाही. उलट कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी असते.महागाई दर दिवशी वाढत असून प्रत्येक वस्तूंचे दर आकाशाला भिडत आहे. या तुलनेत शेती मालाचे दर मात्र जेमतेमच वाढत आहे. उलट शेती लागवडीसाठी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. १९७३ ते २०१५ या ४२ वर्षात शेतमालाचे भाव, पक्क्या वस्तूंचे भाव आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर शेत मालाला कवडीमोल भावच मिळत असल्याचे दिसत आहे. ४२ वर्षापूर्वी कापसाचा एक क्ंिवटलचा दर आणि प्राध्यापकांच्या वेतनात केवळ १०० रुपयांचा फरक होता. कापसाला ५०० रुपये प्रति क्ंिवटल तर प्राध्यापकाला ६०० रुपये दरमहा वेतन मिळत होते. सध्या कापसाचा भाव चार हजार रुपये प्रति क्ंिवटल आणि प्राध्यापकांचा पगार सव्वा लाखांच्या आसपास आहे. ४२ वर्षात कापूस केवळ ८.१ पट तर तर प्राध्यापकांचा पगार तब्बल २०८ पट वाढला आहे. १९७३ साली ज्वारी २०० रुपये प्रति क्ंिवटल, गहू ४०० रुपये, तांदूळ ६०० रुपये प्रति क्ंिवटल होता. तर पेट्रोल ३ रुपये लिटर, डिझेल २ रुपये लिटर आणि सोने ४०० रुपये तोळा होते. मजुराला दिवसाकाठी पाच रुपये मजुरी मिळत होती. याच काळात शिपायाला दरमहा १७५ रुपये वेतन मिळत होते. तर कनिष्ठ लिपिकाचा पगार २२५ रुपये होता. महागाईचा आलेख वाढताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढत गेले. साधा शिपाईही १५ हजार रुपये महिना वेतन घेतो. सोने २७ हजार रुपये तोळ्यावर गेले आहे. तर पेट्रोल ६७ रुपये लिटर आणि डिझेल ५४ रुपये लिटर झाले आहे. मजुरीचे दर २०० रुपये प्रति दिवस झाले आहे. त्या तुलनेत शेती माल मात्र आहे त्या स्थितीतच दिसत आहे. गत काही वर्षात दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ही तफावत दूर होण्याचे कोणतीही चिन्ह दिसत नाही. उलट शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याची घोषणा केली. यात पुन्हा पगारात प्रचंड वाढ होणार आहे. उलट शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे. एकेकाळी उत्तम मानली जाणारी शेती आता कनिष्ठ झाली असून शेतकऱ्यांची मुलेही नोकरीसाठी धडपत करीत आहे. शेती विकून नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. याचे कारण म्हणजे गत काही वर्षात पगारात झालेली भरघोस वाढ होय. एकीकडे महागाई वाढत असताना कापसाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे दुष्काळाची छायाही कायम असते.