शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 7:31 PM

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष.

यवतमाळ -  साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष. आता ९२ व्या संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळातच ग्रंथप्रदर्शनाच्या परंपरेलाही ४५ वर्षे पूर्ण होत आहे.येत्या जानेवारी महिन्यात ११, १२ आणि १३ रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन हे जसे साहित्यिकांचे असते, तसेच रसिकांचेही असते. त्यामुळेच संमेलनस्थळी दरवर्षी कोट्यवधींच्या पुस्तकांची विक्री होत असते. आता यवतमाळच्या संमेलनातही ग्रंथप्रदर्शन भरविण्यासाठी अयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १९७३ साली यवतमाळात कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी पहिल्यांदाच यवतमाळच्या पावनभूमीत ग्रंथप्रदर्शनाचे रोपटे लावण्यात आले. आज ४५ वर्षानंतर या उपक्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले. जेव्हा पहिल्यांदा यवतमाळात संमेलन झाले, त्यावेळी अवघ्या एका वर्गखोलीत पुस्तकांचे दोन स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी एक होता ‘मौज’ प्रकाशनाचा, तर दुसरा होता महाराष्ट्र शासनाचा. या छोट्याशा ग्रंथप्रदर्शनाला त्यावेळी सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, आणि यशवंतराव चव्हाण आदींनी भेटी दिल्याचे ‘मौज’चे प्रतिनिधी अरुण गाडगीळ यांनी सांगितले. यवतमाळात होऊ घातलेल्या ९२ व्या साहित्य संमेलनाचे ग्रंथप्रदर्शन हे एक आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. यवतमाळ ते यवतमाळ हा ४५ वर्षांचा ग्रंथप्रदर्शनाचा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत अरुण जाखडे यांनी ‘गोंदण’ स्मरणिकेच्या लेखातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :marathiमराठी