शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

तळेगावच्या शेतकऱ्यांची ४६ जनावरे दगावली

By admin | Published: May 28, 2016 2:20 AM

दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

भीषण चाराटंचाई : हिरवा दिसणारा फुटवा ठरला जीवघेणा, अनेक मरणासन्न, २५ डॉक्टरांच्या चमूकडून उपचारदारव्हा : दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याअभावी जनावरे विक्रीस काढली जात आहे. मात्र चारा छावण्यांचा पत्ता नाही. चारा नसल्याने जंगलात-शेतशिवारात हिरवे दिसणाऱ्या झुडूपांवर जनावरे धाव घेतात, त्यामुळेच आज जनावरांचा घात झाला. ज्वारीचे फुटवे चारा म्हणून खाल्ल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ४६ जनावरांचा मृत्यू झाला. त्यात ४२ गार्इंचा समावेश आहे. या घटनेने तळेगावातील पशुपालक हवालदिल झाला आहे. फुटवे खाल्ल्याने तब्बल ४६ जनावरे दगावल्याची घटना दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. डोळ्यासमोर पटापट मरणारी जनावरे पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाही. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २५ जणांच्या पथकाकडून उपचार सुरू असून अनेक जनावरे वाचविण्यात यश आले आहे. शेतात मृत जनावरांचा खच पाहून तळेगाववर शोककळा पसरली होती. तळेगाव येथील शेतकरी अतुल सराफ यांनी आपल्या शेतात रबीची ज्वारी पेरली होती. काही दिवसापूर्वी या ज्वारीची कापणी करण्यात आली. त्यानंतर या ज्वारीला हिरवेगार फुटवे फुटले. दरम्यान शुक्रवारी गावातील सुमारे ३५० जनावरे चरण्यासाठी नेहमीप्रमाणे गायरानाकडे निघाले. परिसरात सध्या भीषण चारा टंचाई आहे. जंगलातही चारा उपलब्ध नाही. त्यामुळे गुराख्याने आपली जनावरे अतुल सराफ यांच्या शेतात नेली. त्या ठिकाणी जनावरांनी हिरवेगार दिसणारे कोवळे फुटवे खाल्ले आणि तेथेच घात झाला. काही वेळातच जनावरांचे पोट फुगून खाली कोसळू लागली. हा प्रकार गावात माहीत होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शेतात ठिकठिकाणी मरणासन्नजनावरे दिसून आली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदारांना या घटनेची माहिती देण्यात आली. अवघ्या काही तासातच पशुधन विकास अधिकाऱ्यांचे २५ डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले. तत्काळ उपचार सुरू झाले. परंतु तोपर्यंत ४० गाई, दोन गोऱ्हे आणि चार म्हशी ठार झाल्या. इतर जनावरांवर उपचार सुरू करण्यात आले. या पथकात तालुका पशुधन विकास अधिकारी जी.के. चव्हाण, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. पोटे, डॉ. सोयाम, डॉ. बावस्कर, डॉ. लाडखेडकर, डॉ. मस्के आदींचा समावेश आहे. सोडियम थायोसल्फेट आणि अ‍ॅट्रोफिन सल्फेटचे उपचार सलाईनद्वारे केला जात आहे. तहसीलदार पी.एस. राऊत, गटविकास अधिकारी संजय गुहे, ठाणेदार अनिल गौतम, ग्रामसेवक प्रदीप ठाकरे, तलाठी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. वृत्तलिहेस्तोवर मृत जनावरांचा पंचनामा आणि गंभीर जनावरांचे उपचार सुरू होते. (प्रतिनिधी) या शेतकरी-शेतमजुरांची दगावली जनावरेतळेगाव येथील मजीद खान न्यामत खान यांच्या चार म्हशी, विठ्ठल गायकवाड यांच्या दोन गाई तर प्रदीप विष्णू लेवे, अनंता वासुदेव दांडेकर, वसंता जाधव, महादेव आडे, डोमा राठोड, प्रल्हाद गोवडे, सुनील जाधव, नितेश घोडमारे, वसंत धारणे, दुधराम जाधव, प्रकाश मुलके, सुरेश मेश्राम, ज्ञानेश्वर खोडे, श्रीकृष्ण डफडे, हरिदास जांभोरे, अजय राठोड, पांडुरंग लेवे, गोविंद जाधव, सुनील जाधव, सुरेश खोडे, प्रमोद लेवे, मदन काळबांडे, पांडुरंग निंबेकर, गणेश घरत, सखाराम शिंदे, साहेबराव नारनवरे, जिजाबाई गायकवाड, पांडुरंग जाधव, भगवान चव्हाण, काशीराम जाधव, गजानन जाधव यांच्या प्रत्येकी एक गाईचा समावेश आहे. फुटव्यात असते हायड्रोजन सायनाईडज्वारीचे पीक कापल्यानंतर थुटांना पाणी मिळाल्यास त्यातून हिरवेगार कोंब बाहेर येतात. यालाच फुटवे असे म्हणतात. या फुटव्यात हायड्रोजन सायनाईड या नावाचे विष असते. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवागार चारा पाहून जनावरे तुटून पडतात आणि घात होतो.