शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

‘अ‍ॅन्युईटी’च्या रस्त्यांसाठी ५०० किमीचे पॅकेज; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:09 AM

कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.

ठळक मुद्देतुकड्यांऐवजी बिग बजेट

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. २३ फेब्रुवारी रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ ही सार्वजनिक बांधकाम खात्याची रस्त्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे. परंतु या योजनेला राज्यातील प्रमुख बांधकाम कंत्राटदारांकडून विदर्भ-मराठवाड्यासह काही भागात प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची सोय म्हणून कार्यक्रमातील शर्ती-अटींमध्ये काही बदल करण्यात आले. शंभर किलोमीटरच्या पॅकेजचे अंतर ५० किलोमीटरवर आणण्यात आले. परंतु त्यानंतरही ‘नो-रिस्पॉन्स’ कायम आहे. आता आणखी तुकडे पाडून २० किंवा १० किलोमीटरचे पॅकेजेस् (कामे) केले जातील, असा अंदाज अभियंते व कंत्राटदारांचा होता. मात्र शासनाने तुकड्या-तुकड्यांऐवजी बिग बजेटला पसंती दर्शविली.या रस्त्यांच्या पॅकेजेस्साठी दुसऱ्या मागणीत एकच निविदा प्राप्त झाली असेल तर ती आता उघडली जाणार आहे. दुसऱ्यांदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नसेल तर त्या प्रादेशिक विभागात ५०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतराचे एकच पॅकेज तयार करून निविदा काढली जाणार आहे. रस्त्यांच्या पॅकेजेस्मध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा घोषित झाला असेल तर ती लांबी पॅकेजेस्मधून वगळली जाणार आहे. त्याऐवजी नवी कामे प्रस्तावित केली जाणार आहे. देशातील बांधकाम क्षेत्रातील काही बड्या कंपन्या सरकारला ‘अ‍ॅप्रोच’ झाल्या आहेत. त्यांनी बिग बजेट कामांमध्ये इन्टरेस्ट दाखविला. त्यांची ही तयारी पाहूनच सरकारने किमान ५०० किलोमीटरचे एकच मोठे काम काढण्याचा निर्णय घेतला. चार-पाच जिल्ह्यांमिळून हे एकच पॅकेज राहू शकते.

केवळ पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसादया रस्त्यांना दुसऱ्या वेळी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, नाशिक या भागात प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यात केवळ औरंगाबादमध्ये तर विदर्भात नागपूर व अमरावतीतच प्रतिसाद मिळाला. अमरावतीमध्ये पाच तर नागपुरात दोन कामे मंजूर झाली. म्हणूनच अन्य जिल्ह्यांसाठी बिग बजेट पॅकेजचा निर्णय घेतला गेला. लांब अंतर व दुर्गम क्षेत्रात येणारी रस्त्यांची काही कामे ‘ईपीसी’पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा