शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

६० कोटींचा निधी, पण अपेक्षित विकासकामांत दारव्हा पालिकेला आले अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:39 AM

- पाणीपुरवठा योजना अपूर्ण, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव पाणीपुरवठा योजना अपूर्णच : मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव फोटो ...

- पाणीपुरवठा योजना अपूर्ण, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

पाणीपुरवठा योजना अपूर्णच : मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

फोटो

ग्राउंड रिपोर्ट भाग १

मुकेश इंगोले

दारव्हा : येथील पालिकेत थेट नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेने नगर परिषदेत सत्ता स्थापन केली. गेल्या चार वर्षांत विकासकामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधीही मिळाला. परंतु तरीसुद्धा शहराचा अपेक्षित विकास साधता आला नसल्याचे बोलले जात आहे.

सत्ताधाऱ्यांना मागील कार्यकाळात रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेता आली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, योग्य नियोजनाअभावी खर्च करूनही शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडले. त्यामुळे अद्यापही अनेक समस्या कायम आहेत.

राज्यात सत्ता, स्थानिक आमदार आणि नगर परिषदेवर झेंडा फडकल्यानंतर नागरिकांना विकासकामांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेली ३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेवर टीका करून सत्ता मिळविलेल्या शिवसेनेला चार वर्षांतही ही योजना पूर्णत्वास नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही भागांतील नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

मूलभूतऐवजी इतर कामांना प्राधान्य

विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी भरपूर निधी प्राप्त झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. परंतु विविध भागांतील समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे कामांचे नियोजन करणे आवश्यक असताना मूलभूतऐवजी इतर कामांना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

बॉक्स

मुबलक शुध्द पाण्याची वानवा

नागरिकांना पक्के रस्ते, नाली, पथदिवे, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पाणीपुरवठा योजना रेंगाळल्याने मुबलक व शुध्द पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बॉक्स

पालिकेच्या उत्पन्न वाढीकडे दुर्लक्ष

नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी गेल्या चार वर्षांत फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शहरात रस्त्यावरील अतिक्रमण, वाहन पार्किंग, मोकट जनावरांचा मुक्त संचार यासारख्या समस्या कायम आहेत.

बॉक्स

लेंडी नाल्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष

शहराला वेठीस धरणाऱ्या लेंडी नाल्याचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी याच नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्यावर कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. वर्षभर नाल्यात घाण पाणी साचून राहते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तरीसुद्धा या नाल्याची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले नाही.

बॉक्स

रस्ते, नाल्यांची दुरवस्था

शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, गांधी ले-आऊट, बायपास परिसरातील काही नगरांसह जुन्या वसाहतीतील काही भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर काही परिसरात नाली बांधकाम झाले नसल्याने कच्च्या नाल्यातून सांडपाणी वाहून जात नाही. परिणामी ठिकठिकाणी घाण साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

280821\20210711_181709.jpg

१)शहरातील झालेल्या रस्त्यांची दुरावस्था

२)लेंडी नाल्यात याप्रमाणे झाडेझुडपे वाढली आहे