शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

६० हजार स्मार्ट कार्ड एकाच संगणकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:27 IST

परिवहन महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६० हजारांवर प्रवासी मासिक सवलत पास घेतात. मात्र हे मॅन्यूअल पासेस आता रद्द करून परिवहन महामंडळ स्मार्ट कार्ड देणार आहे. विशेष म्हणजे, या ६० हजार प्रवाशांमध्ये जवळपास ५० हजार विद्यार्थीच आहेत. विविध खेड्यातून यवतमाळातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ते दररोज ये-जा करतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । विद्यार्थ्यांची ससेहोलपट, पिरिएड बंक करून एसटी आगाराच्या रांगेत

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खेड्यातून शिक्षणासाठी यवतमाळात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या ‘अतिस्मार्ट’ कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील ६० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र हजारो नावांच्या रजिस्ट्रेशनचे काम एकाच संगणकावर सोपवून महामंडळ प्रशासन मोकळे झाले. त्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी येणाºया विद्यार्थ्यांना एकतर रांगेत राहावे लागत आहे किंवा पुढची तारीख घेऊन गावाकडे परत जावे लागत आहे.परिवहन महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६० हजारांवर प्रवासी मासिक सवलत पास घेतात. मात्र हे मॅन्यूअल पासेस आता रद्द करून परिवहन महामंडळ स्मार्ट कार्ड देणार आहे. विशेष म्हणजे, या ६० हजार प्रवाशांमध्ये जवळपास ५० हजार विद्यार्थीच आहेत. विविध खेड्यातून यवतमाळातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ते दररोज ये-जा करतात. त्यासाठी यवतमाळ आगारातून त्यांना सवलत पास देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना महामंडळाकडून स्मार्ट कार्ड घ्यावे लागत आहे.महामंडळाचा प्रयत्न स्तुत्यच आहे. मात्र असे स्मार्ट कार्ड देण्याची पद्धती सध्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. आधी विद्यार्थ्यांना आपले आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच कार्ड मिळते. परंतु, या रजिस्ट्रेशनकरिता महामंडळाने केवळ एकच सेंटर यवतमाळ आगारात दिले आहे. त्यातही या सेंटरमध्ये रजिस्ट्रेशनसाठी एकच माणूस आणि एकच संगणक देण्यात आला आहे. परिणामी दररोज शेकडोच्या संख्येत येणाºया विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रजिस्ट्रेशनसाठी रांगेतच राहावे लागत आहे. एकाच संगणकावर काम उरकणे कठीण झाले आहे. लिंक फेल होणे, वेब कॅमेºयातील अडचणी यामुळे अनेकांना महामंडळातर्फे आठ दिवसानंतरची तारीख दिली जात आहे. अशी ‘तारीख पे तारीख’ टाळण्यासाठी विद्यार्थी शाळा-कॉलेजला दांडी मारून एसटी आगारात गर्दी करीत आहेत.खासगी सेंटरवर लूटस्मार्ट कार्ड रजिस्ट्रेशनसाठी यवतमाळ आगारात गर्दी पेलवत नसल्याने आता स्टेट बँक चौक आणि भोसा रोड परिसरात खासगी व्यक्तींना रजिस्ट्रेशनचे काम सोपविण्यात आले. मात्र आगारात प्रती विद्यार्थी ५० रुपये तर खासगी व्यक्तीकडे ७०-८० रुपये आकारले जात आहे. त्यामुळे आगारातच गर्दी होत आहे. महामंडळाने जूनपासून रजिस्ट्रेशन सुरू केले. तरीही जिल्ह्यातील ५० हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. केवळ १२ हजार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. त्यापैकी केवळ ७ हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत कार्ड मिळू शकले. विशेष म्हणजे, महामंडळाने रजिस्ट्रेशन पूर्ण होण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर केली आहे.बहुउपयोगी असेल स्मार्ट कार्डप्रवास सवलत ६६.६६ टक्केकार्डची व्हॅलिडीटी ५ वर्षेस्वाईप मशीनवरून रिचार्ज करता येईललवकरच खासगी बसमध्येही वापरणारखरेदीसाठीही स्वाईप करता येईल

टॅग्स :state transportएसटी