शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

७०० गावे टंचाईच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 9:41 PM

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई उपाययोजना कागदावरच : साडेचार कोटींचा कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुºया पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जलयुक्तशिवार आणि वॉटर कप स्पर्धा राबवूनही अनेक गावे तहानलेली आहे. येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. जून २०१९ अखेरपर्यंत सुमारे ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरीही दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान सुमारे २६९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. याशिवाय एप्रिल ते जूनपर्यंत आणखी ४३१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाभरात तब्बल ६६४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. सोबतच ८९ ठिकाणी टँकर अथवा बैलबंडीद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ६२ हजारांचा खर्च अपेक्षित आहे.मागील वर्षीच्या अनेक योजना रखडल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणच्या योजना रखडल्या आहे. काही गावांमध्ये निधीअभावी योजना ठप्प पडल्या आहेत. काही गावांमध्ये गाव समितीच्या वादातून योजना रखडल्या आहे. अनेक ठिकाणी पाईपही पोहोचले नाही. काही ठिकाणी विंधन विहिरी खोदूनही पाणी लागले नाही. त्याऐवजी दुसºया ठिकाणी विंधन विहीर केली गेली नाही. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.