शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

शेतकऱ्यांना ७५ कोटींची मदत

By admin | Published: January 03, 2017 2:05 AM

खरीप हंगाम हातचा गेल्यानंतरही अंतिम आणेवारीने २०१५ मध्ये शेतकऱ्यांचा घात केला. दुष्काळी

न्यायालयाने फटकारले : २०१५ तील खरीप नुकसानीची रक्कम २०१७ मध्ये यवतमाळ : खरीप हंगाम हातचा गेल्यानंतरही अंतिम आणेवारीने २०१५ मध्ये शेतकऱ्यांचा घात केला. दुष्काळी परिस्थिती असतानाही मदत मिळाली नाही. यावर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने शासनाला फटकारत शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळी मदत देण्याची सूचना केली. त्यावरून अमरावती येथे आयुक्तांनी तातडीची बैठक बोलाविली. आता जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना २०१५ च्या खरीप हंगामातील नुकसानीचे ७४ कोटी ८८ लाख रुपये मिळणार आहे. २०१५ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला होता. मात्र त्यानंतरही जिल्ह्याची आणेवारी उत्तम दर्शविण्यात आली. परिणामी शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. यावर जिल्ह्यात चांगलेच वादळ उठले. दुष्काळाची मदत मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने शासनाला फटकारत शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची सूचना केली. न्यायालयाने निर्देश देताच अमरावती येथे आयुक्तांनी शनिवारी तातडीची बैठक बोलाविली. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याची सूचना दिली. यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना २०१५ साली झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. मात्र ही मदतही तोकडीच राहणार असल्याचे संकेत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांंना केवळ १९ कोटी ६५ लाख ९४ हजार ९४८ रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५४ कोटी ३४ लाख रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे या पेक्षा किती तरी पट अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मदत वितरणासाठी शासनाने काही निकष जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अपुऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांच्या हातात किती मदत पडते हे मात्र यादी जाहीर झाल्यानंतरच पुढे येणार आहे. पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांंना जी मदत मिळते त्या मदतीच्या ५० टक्के मदत पीक विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची सूचना आहे. दुष्काळी मदत देण्यासाठी सहा हजार २०० रुपये हेक्टरी मदतीचा निकष असला तरी पीक विम्याच्या निम्मीच रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे.यामुळे राज्य शासन प्रत्येक शेतकऱ्यांंना हेक्टरी किती रुपये मदत देणार ही बाब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतरच कळणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना आहे. त्यामुळे मदतीस मुकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर) ब्रिटीशकालीन आणेवारीने घात ४२०१५ सारखी स्थिती २०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मात्र ब्रिटीशकालीन आणेवारीने शेतकऱ्यांची स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. यामुळे यावर्षी परिस्थिती चिंताजनक असताना बँक वसुलीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शासनाकडे ७४ कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. आदेश येताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केले जातील. - राजेश खवले निवासी उपजिल्हाधिकारी.