शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

By admin | Published: May 31, 2016 11:59 PM

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या.

सदस्य निश्चित : यवतमाळ पालिकेत राहणार ५६ सदस्य यवतमाळ : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या. यवतमाळ नगरपरिषदेत सर्वाधिक ५६ सदस्य राहणार असून सध्याच्या नगरसेवकाच्या संख्येत १५ ने भर पडणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या निश्चितीचा अहवाल मागविण्यात आला होता. पाठविलेल्या अहवालाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामुळे कुठल्या नगरपरिषदेत किती सदस्य असतील हे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली आहे. किती लोकसंखेला एक सदस्य असावा याचा अहवाल नगरपरिषदेच्या निवडणूक विभागाने पाठविला आहे. या अहवालास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य यवतमाळ नगरपरिषदेचे आहेत. पूर्वी यवतमाळ नगरपरिषदेची सदस्य संख्या ४१ होती. दोन लाख ५१ हजार १२४ लोकसंख्येला ५६ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत १५ सदस्य नगरपरिषदेत वाढणार आहेत.पुसद नगरपरिषदेच्या ७३ हजार ४८ लोकसंख्येला २९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. वणीमध्ये ५८ हजार ८४० लोकसंख्येला २६ सदस्य असणार आहेत. उमरखेडमध्ये ४७ हजार ४५८ लोकसंख्येला २४ सदस्य निश्चित करण्यात आले आहे. दिग्रस नगरपरिषदेमध्ये ४४ हजार ७६७ लोकसंख्येमागे २३ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. दारव्हा नगरपरिषदेत ३४ हजार ९४ लोकसंख्येमागे २० सदस्य निश्चित झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेत ३१ हजार ५९७ लोकसंख्येला १९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. घाटंजी नगरपरिषदेत २१ हजार ३९३ लोकसंख्येला २० सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर सात ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. लोहारा, वडगाव, उमरसरा, वाघापूर, भोसा, मोहा, पिंपळगाव यांचा समावेश आहे. त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती राहणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून होते. आता सदस्य संख्या निश्चित झाल्यानंतर प्रभाग रचनेची उत्सुकता आहे. यावर्षी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. हद्दवाढीने शहराचे राजकीय समीकरण बदलले असून अनेक इच्छुक आपली ताकद आजमाविण्यासाठी तयारी करीत आहे. (शहर वार्ताहर)जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचनानगरपरिषदांतील सदस्य संख्या २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. आता प्रभाग रचनेसाठीसुद्धा जनगणनेतील प्रगणकाचा आधार घेऊनच केली जाणार आहे. त्यानुसार चक्राकार पद्धतीने त्या-त्या प्रभागातील जागेचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत यावरच विजयाचे गणित अवलंबून असते. या दोनही प्रक्रियेवर इच्छुकांचे बारिक लक्ष आहे. अद्याप तरी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी येत्या काही दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ केली जाणार आहे. त्या दृष्टीकोणातून प्रशासनाची तयारी सुरू आहे.