शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गावातल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन, अन् शहरातल्या कोचिंगमध्येच हजेरी !

By अविनाश साबापुरे | Published: June 21, 2024 8:48 PM

आता बस्स झाले..! : शिक्षणाधिकाऱ्यांनी महाविद्यालयांना दिली कारवाईची तंबी

अविनाश साबापुरे/यवतमाळ: एखाद्या खेड्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र ॲडमिशन घ्यायची आणि शहरातल्या खासगी कोचिंग क्लासला हजेरी लावायची, हा प्रकार सर्रास सुरू आहे. या माध्यमातून कोचिंगसोबतच महाविद्यालयांनीही ‘दुकानदारी’ सुरु केली आहे. परंतु, आता या प्रकाराची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली आहे. त्यामुळे यंदा असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर पुणे, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड अशा शहरांमध्ये कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतले जात आहेत. परंतु, जिल्ह्यातील एखाद्या खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र प्रवेश घेऊन ठेवला जातो. संबंधित विद्यार्थी या महाविद्यालयात थेट परीक्षेलाच उगवतो. परंतु, त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र परिणाम होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.या गंभीर बाबीची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना हा प्रकार टाळण्याची तंबी दिली. यंदा अकरावी-बारावीच्या वर्गात कोणीही नाममात्र ॲडमिशन घेऊन गैरहजर आढळल्यास थेट महाविद्यालयावरच कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महाविद्यालयांच्या दुकानदारीला चापपटसंख्या टिकविण्यासाठी अनेक महाविद्यालये अकराव्या वर्गात काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार नाममात्र प्रवेश देतात. त्याला वर्षभर गैरहजर राहण्याची मुभा देतात. त्यात विद्यार्थ्यांचे पालकही प्रवेश फीपेक्षा जास्त पैसे मोजायला तयार असतात. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्याने यंदा महाविद्यालयांच्या या दुकानदारीला चाप बसण्याची शक्यता आहे.

गावातल्या विद्यार्थ्यांना डावलू नकामोठ्या शहरात जाऊन कोचिंग क्लास लावण्यासोबतच अकरावीही करता यावी, याकरिता अनेक विद्यार्थी तालुका पातळीवरील किंवा एखद्या मोठ्या खेड्यातील कनिष्ठ महाविद्यालयात ॲडमिशन घेतात. अशा ‘नाममात्र’ विद्यार्थ्यांना खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयेही आवर्जुन प्रवेश देतात. त्यासाठी गावातल्या स्थानिक विद्यार्थ्यांना ‘प्रवेश फुल्ल’ झाल्याचे सांगतात. त्यामुळे खेड्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी रोज ‘अप-डाउन’ करावे लागते. परंतु आता गावातल्या विद्यार्थ्याला डावलून बाहेरगावच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन देणाऱ्या काॅलेजवर कारवाई केली जाणार आहे.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयYavatmalयवतमाळ