शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.

ठळक मुद्देउभ्या पिकांची सुरक्षा धोक्यात : वाघाची दहशत अद्यापही कायमच

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील सुन्ना या गावातील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतातील बांधावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला करून त्याला ठार कले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. घटना होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतात जायला कुणीही धजावत नसून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.दरवर्षी शेतातील पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे नुकसान होते. वन्यप्राणी शेतात केव्हा शिरेल व केव्हा हल्ला करेल, याचा नेमच राहिला नाही. आता तर चक्क पट्टेदार वाघ जंगलाच्या बाहेर निघून शेतात शिरत आहे. गुरूवारी सुन्ना येथील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतात धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला केला, हे दृष्य पाहून शेतात असलेले मजूर घाबरून गेले. हा थरार काहीजणांनी आपल्या मोबाईल कॅमेºयातही कैद केला.पांढरकवडापासून ११ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सुन्ना या गावात या अभयारण्यामध्ये एक मुख्य प्रवेशद्वार आहे. याच परिसरातून अभयारण्यालगत प्रविण बोळकुंटवार यांचे शेत आहे. बुधवारी महिला मजूर त्यांच्या शेतात काम करीत असतानाच वाघाने हल्ला केल्यानंतर या महिला अतिशय भयभीत झाल्या आहेत. अद्यापही स्वत:च्या डोळ्याने पाहिलेला थरार त्या विसरल्या नाही.तेव्हापासून त्या शेतातही गेल्या नसल्याची माहिती सुन्ना येथील ग्रामस्थांनी दिली. सुन्ना व परिसरातील शेतकरी अद्यापही वाघाच्या दहशतीतच असून शेतीची संपूर्ण कामे ठप्प पडली आहेत. काही शेतकऱ्यांचे तुरीचे पीक अद्यापही काढायचे असून वाघाच्या दहशतीमुळे कोणीही शेतात जायला तयार नाही. गहू-हरभरा या पिकाची रखवाली करणे, तर सोडाच परंतु शेताकडेच फिरकायला कोणी तयार नाही.२६ फेब्रुवारीपासून तळ ठोकून होती वाघिण४गेल्या बुधवारपासून म्हणजे २६ फेब्रुवारीपासून आपल्या चार बछड्यांसह ही वाघिण शेताच्या जवळच असलेल्या खोलगट भागात होती. शनिवारी सकाळपर्यंत या परिसरात ती वावरत होती. परंतु आता ती या भागातून इतरत्र गेली असावी, अशी माहिती प्रविण बोळकुंटवार यांनी दिली. चार दिवसांपासून ही वाघिण याच भागात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यामुळे ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.

टॅग्स :forestजंगल