शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सर्व सभापती रस्त्यावर उतरणार

By admin | Published: April 14, 2017 2:32 AM

जिल्ह्यात लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व केंद्रांवर पडून असताना शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र

कृषी उत्पन्न बाजार समिती : १५ एप्रिलनंतरही तूर खरेदी सुरू ठेवण्याची मागणीयवतमाळ : जिल्ह्यात लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व केंद्रांवर पडून असताना शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. १५ तारखेनंतरही किमान दोन महिने ही तूर खरेदी सुरू ठेवावी, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशारा या सभापतींनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिला आहे. केंद्र शासनाने १५ एप्रिलपासून नाफेडच्या माध्यमातून होणारी शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र केंद्राने राज्याला तर राज्याने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठविले आहे. हे पत्र यवतमाळ जिल्ह्यात धडकताच बाजार समित्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. कारण आजही बहुतांश केंद्रांवर लाखो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. सुरुवातीला बारदाणा नसल्याने व नंतर वेगवेगळी कारणे पुढे करून ही तूर खरेदी थांबविली गेली होती. आता तर ती १५ एप्रिलपासून सरसकट बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला गेला. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी एकजूट केली आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्व सभापतींनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. सभापती म्हणाले, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसह वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. आता १५ एप्रिलपर्यंतच तूर खरेदीचे पत्र आले. नंतर टोकनधारक शेतकऱ्यांची तूर खरेदी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सभापतींनी दिला. खरेदीची मुदत १५ जूनपर्यंत वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळचे रवींद्र ढोक, घाटंजीचे अभिषेक ठाकरे, आर्णीचे राजू पाटील, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, नेरचे रवींद्र राऊत, वणीचे सचिन कुचनकर, नेरचे निखिल जैत, पांढरवकडाचे प्रकाश मानकर तसेच संचालक अनिल पावडे, महेंद्र गोरडे, गजानन डोमाळे, मुकेश देशमुख, सुरेश चिंचोळकार उपस्थित होते. (शहर वार्ताहरजिल्हाधिकाऱ्यांचा निषेधजिल्ह्यातील बाजार समितींच्या सभापतींवर चक्क फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केली आहे. हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणारा असून गुरूवारी जिल्ह्यातील सर्व सभापतींनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचा निषेध नोंदविला.