शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

हेमाडपंथी वास्तूकलेचा प्राचीन वारसा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:02 IST

प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देमंदिरांना तडे : पुरातत्व विभागाचे केवळ फलक, डागडुजीकडे दुुर्लक्ष

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. भाविकांच्या भावना जुळलेल्या मंदिरांचे अस्तित्व लयाला जाण्याचा धोका असतानाही पुरातत्व खात्याचा केवळ अधिकार गाजविणारा फलक मंदिरांपुढे मिरवत आहे. परंतु तडे गेलेल्या, खांब कलथून पडलेल्या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाला फुरसद नाही.विदर्भातील ९३ देखण्या हेमाडपंथी मंदिरांची गॅजेटमध्ये नोंद आहे. त्यातील ७ मंदिरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. नोंद नसलेल्या मंदिरांची संख्या विदर्भात २०० आहे. पुरातत्व विभागाने ताब्यात घेतलेल्या अनेक मंदिरांची पडझड सुरू झाली आहे. बाराव्या शतकात औरंगाबादजवळील देवगिरीचे राजे रामदेवराय यादव यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी ही मंदिरे उभारली. या सर्व हेमाडपंथी मंदिरांची रचना एकसारखी आहे. काळेशार चिरेदार दगड एकावर एक रचून विशिष्ट पद्धतीने ते एकत्र जुळविण्यात आले आहे. या दगडांवर नक्षीकाम आहे. मंदिरांना आतून सुशोभित करण्यात आले आहे. शिखरामध्ये तप करण्यासाठी खोल्या उभारण्यात आल्या आहेत. नदी, संगम आणि कुंड आदींच्या शेजारी ही मंदिर आहेत.पूर्वी अतिशय घनदाट जंगलात ही मंदिरे होती. आता या ठिकाणी जंगल विरळ झाले. मात्र चांगल्या पायवाटाही राहिल्या नाही. पुरातत्व विभागाने मंदिरांपुढे आपल्या विभागाचे फलक लावले. मात्र पुरातत्व विभाग या मंदिराची देखभाल करण्यास विसरले आहे.मंदिरांचे दगड काही ठिकाणी सरकले आहेत. गाभाºयात पाणी गळत आहे. अनेक ठिकाणी तडे गेले. काही भागात कुंडांची पडझड झाली आहे. यामुळे सुरेख मंदिरांचा वारसा येणाºया पिढीला कसा दिसेल, हा प्रश्न आहे. पुरातत्व विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.पुरातत्व विभागाच्या यादीतील मंदिरेपुरातत्व विभागाने जिल्ह्यातील सात हेमाडपंथी मंदिरे ताब्यात घेतली आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर, महागाव कसबा, राऊत सावंगी, येळाबारा, पांढरदेवी, रूईवाई आणि नेरमधील सोमेश्वर मंदिर यांची नोंद आहे. या मंदिरांची अवस्था बिकट आहे. तपोनेश्वर मंदिरात कळसावरून पाणी गळत आहे. दगडही सरकत आहेत. पांढरदेवी मंदिर, नेरच्या सोमेश्वर मंदिराचीही अशीच अवस्था आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या इतर मंदिरांचीही दैनावस्था आहे. दगडांची पडझड आणि कुंडांची पडझड पाहायला मिळते.

पुरातत्व विभागाकडे ताबा असलेल्या मंदिरात इतरांना हस्तक्षेप करता येत नाही. परंतु त्यांना त्यांच्या स्तरावर दुरूस्ती करता येते. त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या. मंदिरांचे वास्तूशिल्प जपावे.- ज्ञानेश्वर महल्लेविश्वस्त, तपोनेश्वर संस्थान

टॅग्स :Templeमंदिर