शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:52 AM

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे ...

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच-उपसरपंचाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार मंगळवारी घडला.

गेल्या काही दिवसांपासून फुलसावंगी ग्रामपंचायत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. गावातील काही नागरिक मंगळवारी ग्रामपंचायतमध्ये तक्रारी घेऊन आले असता त्यांच्या तक्रारी ऐकून न घेता उपसरपंच व इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप करण्यात आला.

गाव नमुना आठ व मृत्यू नोंदी अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तसेच त्यांची कामे वेळेत होऊ दिली जात नाहीत असाही आरोप करण्यात आला. तसेच येथील ग्रामपंचायतमध्ये काही सत्ताधारी सदस्यांकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तुमची कामे कशी होतात हे आम्ही बघून घेऊ, असा उघड दम दिला जात आहे.

या सर्व समस्या सांगण्यासाठी जेव्हा गावातील नागरिक ग्रामपंचायतमध्ये आले, त्यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण न करता उपसरपंचासह इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप विजय महाजन यांनी केला. यावेळी विजय महाजन, अनुप नाईक, अमर दळवे, नसीर खान, समशेर लाला, योगेश वाजपेय, याकूब लाला, आरिफ लाला, शेख मजर, संदीप साखरे, शशिकांत नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.