शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:00 AM

कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देमागणी नसल्याने व्यापाऱ्यांची पाठ मेहनतीवर फेरले पाणी

हमीद खाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. याचा परिणाम केळी पिकावरही प्रचंड प्रमाणात झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.वीज समस्या, पाणीटंचाई, नैसर्गिक संकट, बदलते वातावरण यावर मात करत शेतकऱ्यांनी केळीचे बगीचे फुलविले. त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. लाखो रुपये खर्च करून जोपासणा केली. यातून मोठे उत्पन्न येईल, अशी आशा असतानाच लॉकडाऊनमुळे त्यावर पाणी फेरले गेले. केळीची किरकोळ विक्री करण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच जनावरांचा चारा म्हणून केळी वापरल्या गेल्या.परिसरातील सर्वच फलोत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळाचा तडाखाही बगीच्यांना बसला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लॉकडाऊनपूर्वी मिळाला चांगला भाववडगाव (जंगल) येथील गजानन पोटे यांनी आपल्या तीन एकर शेतात केळीची लागवड केली. यातून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनपूर्वी केळीची पहिली खेप सुमारे ९० हजार रुपयांनी विक्री झाली. त्यावेळी बाजारभावही चांगला होता. लॉकडाऊन झाल्यापासून केळीचे काढणीला आलेले पीक जागीच खराब होत आहे. त्यामुळे त्यांनी ही केळी जनावरांपुढे चारा म्हणून टाकणे सुरू केले.

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस