शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

 पावसाची दडी, अनेकांनी पेरण्या आटोपल्याने चिंता; हवामानाचा अंदाज खोटा ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 8:53 PM

Yawatmal News यंदा पावसाने हूल दिल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पेरण्या केलेले शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्दे पावसाअभावी बियाणे करपण्याची शक्यता

यवतमाळ: यावर्षी हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला. यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार, असे भाकित करण्यात आल्याने व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची टाेबणी केली खरी; परंतु जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वणी तालुक्यात पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार केले असले तरी, वणी तालुक्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशी टोबणी उरकली. त्यानंतर या तालुक्यातील काही भागात केवळ दोनदा पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस शिंदोला, कायर, रासा, गणेशपूर, वणी या भागात कोसळला. आतापर्यंत महसूल मंडळात ५० मिमी पाऊस कोसळल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच कपाशीची टोबणी उरकली. आता पाऊस नसल्याने शेतात असलेल्या जलस्त्रोताद्वारे कपाशीला पाणी दिले जात आहे. ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या आशेने कपाशीची टोबणी केली, त्या शेतकऱ्यांची टोबणी उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 या भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊसच नसल्याने अद्यापही उकाडा कायम आहे. या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी करून त्याची साठवण आपल्या घरी करून ठेवली आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. वणी तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ८९५ हेक्टरवर कपाशी, ६३५ हेक्टरवर तूर, ४५ हेक्टरवर सोयाबीन, अशा एकूण चार हजार ५७५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी - कृषी विभाग

वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी किमान ७५ ते १० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. तसेच बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन वणी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती