शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण; पिकांची नासाडी, शेतकरी चिंतातूर

By सुरेंद्र राऊत | Published: September 07, 2022 4:26 PM

नेर तालुक्यातील शेतकरी झालेत हतबल

नेर (यवतमाळ) : तालुक्यातील संपुर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांना आसमानी संकटासह विविध समस्यांनी घेरले आहे. अगोदरच शेतकऱ्यांनी पेरणी करून सुद्धा त्यावर पाऊस न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पीके खरडुन गेल्याने पुन्हा पेरणी करावी लागली. आता पीक कसेबसे तग धरून असताना त्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनच्या झाडाची पाने या अळ्या फस्त करत आहे. पिकाचे संरक्षण कसे करावे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

पीक परिस्थिती सुधारित असताना सततधांर पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने पाहणी केली. शेतकरी हा दोन महिन्यापासून संततधार पाऊस असल्याने चिंतातुर होता. यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या शेतात जमिनीसह पिके खरडून गेली. या नैसर्गिक संकटामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. हे संकट काहीसे दूर होत नाही तर तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात आली. पीक वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना अतोनात प्रयत्न करावे लागत आहे.पिकांची परिस्थिती चांगली असतानाच सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे आहे. 

शेतकऱ्यांना शेतातील पीक घरी येईल की नाही याची चिंता वाटत आहे. यावर्षी पेरणीच्या काळात उगवलेल्या कोवळ्या पिकांवर गोगलगायीने सुद्धा हल्ला केला होता. यातून कसेबसे पीक वाचविले. आता सोयाबीन पीक लष्करी अळी फस्त करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने सरसकट शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. या गावांमध्ये अळीचा सर्वाधिक प्रकोपआता तालुक्यातील परजना, अडगाव, पांढरी ,खोलापुरी, शिरजगाव खानापूर, खरडगाव, दोनद, उमरठा इतर शिवारातील शेतकऱ्यांना अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कीटकनाशकाचे फवारे करूनही अळी नियंत्रणात येताना दिसत नाही. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मात्र या संकटाबाबत कुठल्याही उपाययोजना सांगितल्या जात नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती