शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न : प्रा. श्याम मानव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:56 IST

Yavatmal : उमरखेड येथे 'संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव'वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर निर्माण केलेले संविधान हे प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित जीवनाची हमी देते. संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान वाचविण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले आहे.

राजस्थानी भवन येथे बुधवारी आयोजित 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दशरथ मडावी, सुरेश झुरमुरे उपस्थिते होते. अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा. मानव यांनी सद्यःस्थितीत चाललेल्या देशाच्या व राज्याच्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका केली. सरकारने चालविलेल्या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. 

जातीय सलोखा बिघडविण्याचे व अंधश्रद्धा, बुवाबाजीला खतपाणी घालण्याचे काम करीत आपली सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांनाही नामोहरम करीत जेलमध्ये घालण्याचा कुटील प्रयत्न केंद्र सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात केल्याचा आरोप प्रा. मानव यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळातील पायाभूत सरकारी कंपन्या बड्या उद्योगपतींना विकून देशाला कंगाल करण्याचा घाट सरकार करीत आहे. संविधानाशी फारकत घेऊन सरकारची वाटचाल सुरू आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व दिवसेंदिवस नैसर्गिक संकटात वाढ होत असल्याने देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. संविधान निर्मितीमागे देश हिताची तळमळ होती. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठीच आहे, असा संभ्रम लोकांमध्ये पसरविण्यात येत असल्याचे प्रा. मानव म्हणाले. यावेळी २७ वर्षांपासून उमरखेड तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम निस्वार्थ भावनेने करून वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागात रुजवणारे अंनिसचे अध्यक्ष माधवराव चौधरी व सचिव राजीव गायकवाड यांचा श्याम मानव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देवानंद मोरे यांनी केले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ