शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

जनगणना टाळणे हाच खरा ओबीसींचा अवमान; 'राष्ट्रीय पिछडा वर्ग’ने काढला मोर्चा 

By अविनाश साबापुरे | Published: March 31, 2023 5:07 PM

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात मोर्चा

यवतमाळ : ओबीसींचा अवमान झाला म्हणून केंद्रातील भाजप सरकार गवगवा करीत आहे. मात्र ओबीसींची जातवार जनगणना टाळणारे भाजप सरकारच ओबीसींचा खरा अवमान करीत आहे, अशी टीका करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी संपूर्ण समाजबांधव संविधान चौकात गोळा झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. निवडणुकीत इव्हीएम मशिनचा वापर करू नये, खासगी क्षेत्रातही एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, शेतकऱ्यांसाठी एमएसपी हमी कायदा करावा, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांची रोखलेली शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. यावेळी गजानन उल्हे, दीपक प्रधान, किशोर राठोड, बळीराम दिवटे, सुरेंद्र परडके, हरीश राऊत, सारिका भगत, नीरज कचवे, विलास भोयर, प्रवीण गुजर, संदीप मून, दर्शन परडके, सुखदेव पंचभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी स्वीकारले. 

यापुढे ५ एप्रिल रोजी देशातील ५६३ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १७ एप्रिल रोजी या सर्व ठिकाणी रॅली काढली जाणार आहे. तर आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, असे गजानन उल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीagitationआंदोलनYavatmalयवतमाळ