शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

By admin | Published: January 02, 2016 8:37 AM

जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर

यवतमाळ : जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर ‘थर्टी फर्स्ट’ला पैशाची उधळपट्टी दरवर्षीच होत आली. यंदा मात्र गरिबांच्या जखमांवर मीठ चोळणारा हा प्रकार टाळण्यासाठी लोकजागृती मंचने अनोखा उपक्रम शहरात राबविला. ज्यावेळी ‘थर्टी फर्स्ट’च्या बहाण्याने नागरिक दारूमध्ये धुंद होतात, नेमक्या त्याचवेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा कार्यक्रम अनेकांच्या संवेदना जागवून गेला. यावर्षी जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती आहे. नापिकीमुळे तब्बल ३८४ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यू कवटाळला. कित्येकांनी तर केवळ सणाच्या दिवशी आपल्या मुलांना नवे कपडे घेऊन देऊ शकत नाही, या आगतिकतेपायी आत्महत्या केली. नेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने थेट पालकमंत्र्यांनाच आपल्या जीवनाची करुण कहानी सांगणारी चिठ्ठी लिहून जीव दिला. उमरखेड तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास लावला. ऐनवेळी त्याची अर्धांगिनी पोहोचल्याने त्या शेतकऱ्याला मरणापासून परावृत्त करता आले. पण शेतकऱ्यांचे जीव गरिबीपायी जात असताना जिल्ह्यातील श्रीमंत आणि पांढरपेशा वर्गाने शेतीच्या समस्येपासून फारकत घेता कामा नये, अशी भूमिका घेवूनच लोकजागृती मंचने ऐन ‘थर्टी फर्स्ट’च्या औचित्यावरच शेतकऱ्यांचे दु:ख जगजाहीर करण्याचा कार्यक्रम आखला. येथील तिरंगा चौकात ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला भूदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, डॉ.रमाकांत कोलते, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र ठाकरे, नरेश उन्हाळे गुरुजी, डॉ.आलोक गुप्ता, न.मा. जोशी, नागेश गोरख, विजया धोटे, साहेबराव खडसे, डॉ.छाया महाले, वर्षा निकम, शब्बीर बेग, अन्सारी चाचा, साहेबराव पवार उपस्थित होते. लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आणि घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेश इंगोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन हेमंतकुमार कांबळे यांनी केले. विजय दुरुतकर व त्यांच्या संचाने शेतकऱ्यांची उमेद जागविणारी गीते सादर केली. या मैफलीचे सूत्रसंचालन रूपेश कावलकर यांनी केले. शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषासाठी धावपळ सुरू असतानाच या कार्यक्रमाने अनेकांची बहकलेली पावले तिरंगा चौकात खिळवून ठेवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे घोषित झाले आणि जिल्ह्यातील दुष्काळावरही शिक्कामोर्तब झाले. (स्थानिक प्रतिनिधी)दारू टाळण्यासाठी दुधाचे वाटप४‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने अनेक तरुण दारूच्या आहारी जातात. पैशाची ही उधळपट्टी गरिबांच्या जखमा ताज्या करीत असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकजागृती मंचने कार्यक्रमस्थळी दुधाचे वाटप केले. केसरयुक्त गरम दुधाच्या कढया कार्यक्रमाच्या ठिकाणी लावून तरुणांना मोफत दूध वाटप करण्यात आले. दारू ढोसण्याऐवजी दूध प्राशन करून नवी पिढी बलदंड व्हावी, असा संदेश यातून देण्यात आला.