शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

आरोग्य, झेडपीतील १९ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:30 AM

जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. यामुळे या पदासाठी अर्ज भरून ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी या पदाकरिता अर्ज केलेले आहे. त्यांना भरती प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

आरोग्य विभागामध्ये सहा हजार पदांसाठी २०२१ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. या पदाकरिता नव्याने प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार हा उमेदवारांचा प्रश्न आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील १३ हजार पदांकरिता अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. सन २०१९ मध्येच यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. परंतु या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना ना कॉल आले, ना परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांचा कालावधी लोटूनही भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेमके घोडे कुठे अडले हा त्यांचा प्रश्न आहे. उमेदवारांनी आंदोलने केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ