शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आयुष्यमान उपकेंद्र नामधारी; खासगीत घ्यावे लागतात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:49 IST

Yavatmal : तळणी उपकेंद्राचा बेताल कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क कुन्हा (तळणी) : नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यविषयक उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, काही ठिकाणचे उपकेंद्र नामधारी ठरले आहे. यातीलच एक तळणी (कुन्हा) येथील उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार चालते. अनेकदा नागरिकांना आरोग्य विषयक सेवा मिळत नाही. समुदाय आरोग्य अधिकारी (डॉक्टर) सुटीवर असल्यास औषधोपचार परिचारिकेकडून केला जातो.

भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तळणी आरोग्य उपकेंद्र आहे. या केंद्राच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी नियुक्त असलेले डॉक्टर, कर्मचारी अपवादानेही मुख्यालयी राहत नाही. ही बाब नित्याची झालेली आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. उपकेंद्र केव्हा उघडायचे, केव्हा बंद करायचे, उघडायचे की नाही, हे सर्व तेच ठरवतात. यासाठी कारणेही ठरलेली आहेत. 

सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२५ वाजता आरोग्य उपकेंद्र बंद होते. रुग्ण तपासणी सुरू होण्याची वेळ सकाळी ८:३० वाजताची आहे. याविषयी आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता सीएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी), एमपीडब्ल्यू (आरोग्य कर्मचारी) सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. एका आरोग्य सेविकेची रात्रपाळीत कामगिरी होती, तर दुसरी आरोग्य सेविका गावात व्हिजिट देत असल्याची माहिती देण्यात आली. आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. परंतु, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना खासगी डॉक्टरकडे मदत घ्यावी लागते. 

तळणी आरोग्य उपकेंद्राची निवासस्थाने अडगळीततळणी येथील आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. मात्र, याचा उपयोग होत नसल्याने ती अडगळीत पडली आहे. या कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तो व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते.

"डॉक्टर रजेवर असल्यास इतर कर्मचारी आयुष्यमान आरोग्य मंदिराचा कारभार सांभाळतात. सोमवारी सीएचओ, आरोग्यसेवक सुटीवर होते. आरोग्यसेविका व्हिजिटला गेल्या होत्या." - ऋतुश्री राऊत, सीएचओ, तळणी

"आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून आरोग्य विभागाला पत्र देण्यात आहे आहे. विभागाने पत्राकडे दुर्लक्ष केले आहे." - श्रीराम मेश्राम, सरपंच, तळणी (कुहा)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ