शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 10:24 PM

व्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो.  राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे.  दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताची चिकित्सा करण्यात आली. रस्ता सरळ व सुटसुटीत असतानाही अपघात का होतात, हा प्रश्न उपस्थित करून चौकशी केली असता तब्बल ३०२ प्राणांकित अपघात झाले. यात ३१८ जणांचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रीय महामार्ग ३६१ यावर कळंब ते उमरखेड दरम्यान जिल्हा वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा पोलिस दल यांच्याकडून संयुक्त प्रयत्न करण्यात आले. यात अनेक व्यावसायिकांनी आपल्या सोईसाठी महामार्गावरील दुभाजक तोडल्याचे आढळून आले. अशा विरोधात पोलिसांनी स्वत:हून तक्रार देत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात पुढील कारवाई केली जात आहे. पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. शासकीय संपत्तीचे नुकसान पडेल महागात- भारतीय दंड विधान यातील कलम ४३१ गुन्हा दाखल करून त्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. - याशिवाय सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम यातील कलम ३, ५ नुसार गुन्हा दाखल केला जातो व कारवाई होते. 

जिल्ह्यात दहा महिन्यांत नऊ जणांवर कारवाई पोलिसांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक तोडणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर नऊ ठिकाणी सोयीसाठी दुभाजक तोडल्याचे निदर्शनास आले आहे. यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहे. 

अपघाताची शक्यता वाढते ठरावीक अंतरावरच महामार्गाच्या दुभाजकावर वळण्यासाठी जागा दिलेली आहे. मात्र, व्यावसायिकांनी आपला ढाबा, पेट्रोलपंप याच्यासमोरच दुभाजक तोडल्याने लेन कटिंगचा प्रकार वाढला. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. 

पेट्रोलपंप, हॉटेल चालकांनो सावधानव्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे. दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर कळंब ते उमरखेड दरम्यान कारवाई- नागपूर ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. या मार्गावर अपघात वाढले. याचे कारण शोधले असता कळंंब ते उमरखेड दरम्यान अनेक ठिकाणी सोईने दुभाजक तोडल्याचे आढळून आले आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस