शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

स्पर्धा परीक्षेत भरारी घेणारी भंडारीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:00 AM

भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुक्यात वेगळी ओळख : निवासी सुसंस्कार शिबिर, मातृप्रबोधन कार्यशाळा, दरवर्षी नवोदयमध्ये यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोरगरिबांची खेड्यापाड्यात अभावग्रस्त जीवन जगणारी निरागस मुलेही स्पर्धेच्या युगात पुढे गेली पाहिजे, या निर्धाराने पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळा वेगळी वाटचाल करीत आहे. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच चक्क प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेण्याचा या शाळेचा पायंडा उपयुक्त ठरला आहे.भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.रोजमजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यात भंडारीच्या शाळेला यश मिळाले. या शाळेने चालविलेल्या हंगामी वसतिगृहाला चांगला प्रतिसाद आहे. जादा वर्ग घेऊन शाळेत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. उन्हाळी सुटीत निवासी स्वरूपाचे सुसंस्कार शिबिर घेतले जाते. यात विद्यार्थ्यांसह प्रौढ पालकही सहभागी होतात. नियमित पालकसभा आणि मातृप्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शालेय परिसर हिरवागार आणि गाव परिसरातही वृक्षारोपण व संवर्धन करणारी भंडारी जिल्हा परिषद शाळा आकर्षण ठरली आहे.गावकरी वाचनालय रुजविलेभंडारीच्या शाळेने लोकसहभाग मिळवून गावात चक्क गावकरी वाचनालय सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावातील रोजमजुरी करणाºया पालकांनाही वाचनाची सवय लागली आहे.भंडारीत सुरू झालेला स्नेहभोजनाचा उपक्रम नंतर शासनाने राज्यभरात लागू केला, हे विशेष. भंडारीत आजही या उपक्रमात मिष्ठान्नासह पौष्टीक आहारही विद्यार्थ्यासह पालकांनाही दिला जातो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षक स्वखर्चाने साहित्य पुरवितात.आमच्या एकूण पटापैकी ४६ टक्के मुले बाहेरगावची आहेत. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने इच्छा असूनही परगावातील अनेक मुलांना भंडारीत येता येत नाही. प्रगती दिसली तर पालक माध्यम व इतर गोष्टी पाहत नाही. पालकांचे समाधान आणि बालकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे.- गणेश एस. चव्हाण, मुख्याध्यापकआम्हा गावकऱ्यांना आमच्या शाळेचा अभिमान आहे. शिक्षकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे यंदा पाच विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.- गजानन इंगोले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीआमच्या शिक्षकांनी गावातील सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला. गणेश चव्हाण यांच्यामुळे शाळेचा कायापालट झाला.- मनोहर जाधव,पालक

टॅग्स :Schoolशाळा