शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बँकांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची बँक म्हणवून घेणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वांत आघाडीवर असल्याचे खातेदारांच्या लक्षात आले आहे.कधीकाळी बँकाच्या ...

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : ग्राहकांना अकारण भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची बँक म्हणवून घेणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वांत आघाडीवर असल्याचे खातेदारांच्या लक्षात आले आहे.कधीकाळी बँकाच्या सेवा मोफत असायच्या. ग्राहकांचे बचत खाते व ठेवखात्यात असलेल्या रकमेतून मिळणाऱ्या जादा व्याजावर बँकाचा नफा ठरायचा. त्या नफ्यातून बँका आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करूनही बँकाना फायदा व्हायचा. मात्र जेव्हापासून बँकामध्ये संगणकीकरणाचा प्रवेश झाला, तेव्हापासून बँका पूर्णपणे व्यावसायीक बनल्या आहेत. आता कोणतीही बँक ग्राहकांना मोफत सेवा देत नाही, तर विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कपात करते. ही रक्कम ग्राहकांना नगण्य वाटत असली तरी लाखो खातेदारांकडून करोडो रूपयांची माया जमवून बँका आपला खिसा गरम करून घेत आहे. विविध सेवांचे दरही बँकनिहाय वेगवेगळे दिसून येत आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक इतर बँकेच्या तुलनेत अधिक वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका खातेदाराने त्यांच्या विविध बँकाच्या खात्यातील कापलेली रक्कम तुलनात्मक मांडली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएम कार्डाचे वार्षिक शुल्क १७७ रूपये, वार्षिक सेवा कर ५९ रूपये व एसएमएस चार्जेसचे ७०.८० रूपये, असे ३०६.८० रूपये ग्राहकांच्या खात्यातून कपात केले आहे. वास्तविक पाहता जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम जिल्ह्यात कोठेही नाही. यस बँकेच्या भरवशावर ही सेवा सुरू आहे. मात्र पुसद अर्बन बँकेने ग्राहकांकडून वसुल केलेले ईन्सीडेन्सी चार्जेसचे १०८ रूपये ग्राहकांना पुन्हा परत केले आहे, तर भारतीय स्टेट बँकेने एटीएम कार्डाची वार्षिक फि १४७ रूपये व एसएमएस चार्जेसचे २४ रूपये, असे १७१ रूपये कपात केले आहे. एकंदरीत ग्राहकांना बँकाचे संगणकीकरण तोट्यात आणणारे ठरत आहे.शेतकऱ्यांच्या हिताची बँक कशी?जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक म्हणून ओळखली जाते आणि याच बँकेद्वारे शेतकऱ्यांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी रक्कम वसुली केली जात असल्याने ही बँक शेतकºयांच्या हिताची कशी असा प्रश्न विचारला जात आहे.