शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांंना उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 1:09 PM

काँग्रेसची जनसंवाद यात्रा

यवतमाळ : अतिवृष्टीनंतर आर्थिक साहाय्य करणार म्हणाले, ५० हजारांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला, त्यानंतर शेतकरी सन्मान निधीच्या बाता मारल्या. यापैकी किती जणांच्या खात्यात अनुदान पडले, असा सवाल करीत उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही घेणे-देणे नसल्याची टीका करीत भाजप सरकार राज्यातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मंगळवारी दुपारी काँग्रेसची जनसंवाद यात्रा यवतमाळमध्ये आली. वडकी, राळेगाव, आर्णी आदी ठिकाणीही यात्रेअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यवतमाळ येथील कळंब चौकात यात्रेचे स्वागत करण्यात आले, तर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करीत असलेल्या आंदोलकांशी वडेट्टीवार यांनी आर्णी बायपासवर संवाद साधला. त्यानंतर माळम्हसोला येथील शेतात वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, तसेच नागरिकांशी संवाद साधला.

सोयाबीनची अवस्था वाईट आहे, कापसाचे भाव पडलेले आहेत, शेतकऱ्याला चार पैसे मिळतील असे वाटत असताना सरकारने कांदा निर्यातीवर ५० टक्के टॅक्स लावला. आता तांदळावरही २० टक्के टॅक्स लागू केला आहे. दुसरीकडे अदानी सारखे उद्योगपती मोठमोठ्या वखारी खोदून स्वस्तात शेतमाल खरेदी करणार आहेत आणि दरवाढ झाल्यानंतर हाच शेतमाल दाम दुपटीने विकणार आहेत, अशी सारी व्यवस्था मोदी सरकारने देशात उभी केली आहे. या सरकारला शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नाशी कसलेही देणे-घेणे नसल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सध्या राज्यातील परिस्थिती विदारक झाली आहे, मराठा आंदोलकांवर लाठीमार होतो आहे, दुसरीकडे मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचाराच्या प्रमाणातही भयंकर वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, यवतमाळ काँग्रेस प्रभारी संजय राठोड, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, जावेद अन्सारी, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप साळवे, संजय भोयर, नारायण राठोड, सरपंच उमेश चव्हाण, ओम तिवारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाजपने घेतला ‘इंडिया’चा धसका

महाराष्ट्रासह देशात भाजपविरोधात इंडिया आघाडी आकाराला येत आहे. या आघाडीची एकजूट पाहून भाजपने धसका घेतल्याचे सांगत त्यामुळेच इंडियाऐवजी भारत असे गॅझेटमध्ये नाव बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे सर्व्हे येत असून पुढील काळात कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास भाजपची आणखी घसरण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदेश कोणी दिले; नार्को टेस्ट करा

जालना जिल्ह्यात शांततामय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपण लाठीमार करण्याचे आदेश दिले नव्हते, असे म्हटले आहे. आदेश नव्हते, तर एसपींनी लाठीचार्ज कसा केला या प्रकरणात दुय्यम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मग हीच कारवाई एसपींवर का करीत नाही, असा सवाल करीत सर्वांचीच नार्को टेस्ट करावी, म्हणजे कोणी आदेश दिले हे पुढे येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ