शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

वटफळीतील बीपीएल कुटुंब घरकूल लाभापासून वंचित

By admin | Published: June 27, 2017 1:28 AM

स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.

ग्रामपंचायतीची आडकाठी : जागेविषयी अनेक प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्कनेर : स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीवरही कारवाई झाली नाही. त्यामुळे या वंचित नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वटफळी येथे गट क्र.१४२ मध्ये मागील ४० वर्षांपासून अनेक कुटुंब वास्तव्याला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी रहिवाशांची स्वत:च्या नावे जागा असल्याची नोंदही आहे. परंतु ग्रामपंचायतीने काही वर्षांपासून गट क्र.१४२ ही अतिक्रमणात असून तेथे घरकूल देता येत नाही, असा आदेश काढला. वास्तविक या भागामध्ये यापूर्वी चार टप्प्यात घरकूल झाले आहे. आता मात्र सरपंच, सचिव आणि काही सदस्यांकडून ही जागा महसूल विभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असल्याचेही कधीकधी सांगितले जाते. नेमकी ही जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित होत असतानाच गरजू मात्र घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. परंतु कुणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीला त्यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता ५० नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.